Death: दहीहंडी उत्सवादरम्यान घडला दुर्देवी अपघात, चिमुकलीचा जागीच मृत्यू

बुलढाणा: राज्यात एकीकडे दहीहंडीचा (dahi handi) उत्सव जल्लोशात सुरू असताना बुलढाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. दहीहंडीसाठी ज्या गॅलरीला दोरी बांधली होती ती गॅलरी कोसळून झालेल्या अपघातात एका चिमुकल्या मुलीचा जागीच मृ्त्यू झाला आहे. या घटनेने दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट लागले आहे. यात आणखी एक मुलगी जखमी झाली आहे.


दहीहंडीनिमित्त घराच्या गॅलरीला याचा दोर बांधण्यात आला होता. ही दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा वर चढले होते. यामुळे त्या दोराला युवक लटकले असताना सिमेंटच्या पिलरसह गॅलरी खाली कोसळली. यावेळी निशा रशीद खान पठाण(वय ९ वर्षे) ही मुलगी दहीहंडी पाहत होती. या अपघातात निशा रशीद खानचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला.


या दुर्घटनेत शेख हाफिज(वय ८ वर्षे) या मुलीच्या डोक्याला तसेच पायाला गंभीर जखम झाली असून तिला प्रथमोपचार केल्यावर जालना येथील रुग्णालयात हलवण्यात आले. तसेच मृत निशा रशीद खान हिचा मृतदेह पोस्टमार्टेमससाठी पाठवण्यात आले. दरम्यान, या उत्सवादरम्यान चिमुकलीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे