जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची प्रकृती खालावली आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. २९ ऑगस्टपासून ते उपोषणास बसले आहेत. या काळात त्यांच्या पोटात अन्नाचा एक कणही गेलेला नाही. यामुळे आता त्यांची तब्येत बिघडली आहे. आज सकाळी डॉक्टरांचे पथक उपोषणस्थळी पोहचले आहे.
राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने सलग दोन दिवस जरांगे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी आरक्षणाचा जीआर घेऊन आल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असे स्पष्ट शब्दांत सांगितले होते. त्यामुळे शिष्टमंडळाला रिकाम्या हाताने परतावे लागले. यानंतरही जरांगे यांचे उपोषण सुरुच असल्यामुळे कालपासूनच त्यांना अस्वस्थ वाटत होते. उपोषणामुळे जरांगे यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना आज सलाईन लावण्यात आले.
मात्र मी आरक्षण (Maratha Reservation) घेतल्याशिवाय उठणार नाही, असा ठाम निश्चय जरांगे यांनी केला आहे. डॉक्टर जरांगे यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहेत.
बुलढाणा : बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. बुलढाण्यात…
कारचालक फरार मुंबई : राज्यभरात हिट अँड रनच्या (Heat And Run) वाढत्या केसेसमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले…
नागपूर : विदर्भात अधिकाधिक रोजगारनिर्मिती होण्याच्या दृष्टीने सर्व सुविधांनी परिपूर्ण औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्यावर आपण…
मुंबई : मुंबई मेट्रो मार्ग ३ साठी केंद्र सरकारद्वारे जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था (जायका) यांच्या…
सुरत: सुरतच्या सचिन परिसरात शनिवारी बहुमजली इमारत कोसळली. ही इमारत कोसळल्यानंतर एनडीआरएफ, फायर ब्रिगेडचे संघ…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा…