जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची प्रकृती खालावली आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. २९ ऑगस्टपासून ते उपोषणास बसले आहेत. या काळात त्यांच्या पोटात अन्नाचा एक कणही गेलेला नाही. यामुळे आता त्यांची तब्येत बिघडली आहे. आज सकाळी डॉक्टरांचे पथक उपोषणस्थळी पोहचले आहे.
राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने सलग दोन दिवस जरांगे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी आरक्षणाचा जीआर घेऊन आल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असे स्पष्ट शब्दांत सांगितले होते. त्यामुळे शिष्टमंडळाला रिकाम्या हाताने परतावे लागले. यानंतरही जरांगे यांचे उपोषण सुरुच असल्यामुळे कालपासूनच त्यांना अस्वस्थ वाटत होते. उपोषणामुळे जरांगे यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना आज सलाईन लावण्यात आले.
मात्र मी आरक्षण (Maratha Reservation) घेतल्याशिवाय उठणार नाही, असा ठाम निश्चय जरांगे यांनी केला आहे. डॉक्टर जरांगे यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहेत.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…