India vs Pakistan match : बीएमडब्ल्यूची कार परवडली; पण भारत पाकिस्तान सामन्याचे तिकीट!

बाप रे! केवळ तिकीटाची किंमत ऐकाल तर...


मुंबई : क्रिकेटच्या मैदानात सध्या वर्ल्ड कपचे (World Cup 2023) वारे वाहायला सुरुवात झाली आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड कपचा पहिला सामना ५ ऑक्टोबरला अहमदाबाद येथे होणार आहे. तर भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथे ८ ऑक्टोबरला होणार आहे. वेळापत्रक कसंही असलं तरी भारतीयांना उत्सुकता असते ती मात्र भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची (India vs Pakistan match). यावर्षी हा सामना १४ ऑक्टोबरला रंगणार आहे.


भारत पाकिस्तान सामना म्हटलं की भारतीय आपल्या व्यग्र वेळापत्रकातून कसाही वेळ काढतात आणि टीव्ही किंवा मोबाईलसमोर बसतात. मात्र हा सामना प्रत्यक्षात पाहायचा असेल तर? शक्य आहे ना, पण त्यासाठी किंमतही प्रचंड मोजावी लागणार आहे. भारतीय सामन्यांच्या तिकिटांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. वर्ल्ड कपच्या सामन्याच्या तिकीटविक्रीला सुरुवात झाली असून तिकीटाची किंमत फारच जास्त आहे. काही तिकीट बुकिंग वेबसाइट्सनी भारताच्या सामन्यांची सर्व तिकिटे विकली आहेत. तर काही तिकिटे अद्याप वेबसाइटवर उपलब्ध आहेत.


Viagogo नावाच्या तिकीट संकेतस्थळावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्याच्या तिकीटांची लाखोंमध्ये विक्री होत आहे. वेबसाइटवर, वरच्या श्रेणीतील तिकिटाची किंमत ५७ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचे दिसत आहे. या वेबसाइटवर तिकिटाची सर्वात कमी किंमत ८० हजार रुपये आहे. बुक माय शो या तिकीट बुकिंग वेबसाइटवर भारताच्या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

उबाठाच्या त्या माजी ज्येष्ठ नगरसेवकांना बसावे लागणार घरी

मुंबई (खास प्रतिनिधी) : आगामी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत उबाठाने आता तरुणांना आणि नवीन चेहऱ्यांनाच

महापालिकेच्या शीव रुग्णालयात अस्थिमज्जा प्रत्यारोपण सुविधा क्षमतेत ४०० टक्क्यांनी वाढ

तब्बल १२० प्रत्यारोपण केले जाणार मुंबई (खास प्रतिनिधी) : शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण

महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील

कोस्टल रोडच्या जोड रस्त्यांच्या बांधकामातील अडथळे दूर, जोड रस्त्याचे काम पूर्ण होताच लोखंडवाला, सात बंगल्यातील नागरिकांचा प्रवास सुकर

मुंबई (खास प्रतिनिधी) : कोस्टल रोड (उत्तर)ला जोडल्या जाणाऱ्या अतिरिक्त पुलाच्या जोडणीचे काम मागील दीड वर्षांपासून

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

महाराष्ट्र सागरी मंडळाचे २६० कोटींचे सामंजस्य करार

हरित बंदर विकास विषयी डेन्मार्कच्या कंपनीसोबत मंत्री नितेश राणे यांची सविस्तर चर्चा मुंबई : नेस्को गोरेगाव