Accident: टेम्पो-कारच्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार, तिघे जखमी

पुणे: पुण्याच्या शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे टेम्पो आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात (tempo-car accident) तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्यावरील तोडकर वस्ती येथे हा भीषण अपघात घडला.


हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा अक्षरश: चुराडा झाला. तळेगाव ढमढेरे येथील तोडकर वस्तीजवळ टेम्पो आणि कार यांची समोरासमोर जोरदार धडक बसली. या अपघातात कारमधील कविता बोरूडे(वय ४० वर्षे), योगिता बोरुडे(वय ४० वर्षे) आणि कार ड्रायव्हर राजू शिंदे(वय २५ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला.


तर कारमधील किशोरी बोरूडे(वय १७ वर्षे) तसेच टेम्पोमधील धीरज कांतीलाल लोखंडे आणि श्रीराम बापूराव मांडे हे तीन जण जखमी झाले. जखमींना तातडीने रूग्णालयात नेले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला याचे कारण समोर आलेले नाही. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. तसेच अपघातातील मृत व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेले आहेत.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा