Accident: टेम्पो-कारच्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार, तिघे जखमी

पुणे: पुण्याच्या शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे टेम्पो आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात (tempo-car accident) तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्यावरील तोडकर वस्ती येथे हा भीषण अपघात घडला.


हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा अक्षरश: चुराडा झाला. तळेगाव ढमढेरे येथील तोडकर वस्तीजवळ टेम्पो आणि कार यांची समोरासमोर जोरदार धडक बसली. या अपघातात कारमधील कविता बोरूडे(वय ४० वर्षे), योगिता बोरुडे(वय ४० वर्षे) आणि कार ड्रायव्हर राजू शिंदे(वय २५ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला.


तर कारमधील किशोरी बोरूडे(वय १७ वर्षे) तसेच टेम्पोमधील धीरज कांतीलाल लोखंडे आणि श्रीराम बापूराव मांडे हे तीन जण जखमी झाले. जखमींना तातडीने रूग्णालयात नेले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला याचे कारण समोर आलेले नाही. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. तसेच अपघातातील मृत व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेले आहेत.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे