Accident: टेम्पो-कारच्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार, तिघे जखमी

पुणे: पुण्याच्या शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे टेम्पो आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात (tempo-car accident) तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्यावरील तोडकर वस्ती येथे हा भीषण अपघात घडला.


हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा अक्षरश: चुराडा झाला. तळेगाव ढमढेरे येथील तोडकर वस्तीजवळ टेम्पो आणि कार यांची समोरासमोर जोरदार धडक बसली. या अपघातात कारमधील कविता बोरूडे(वय ४० वर्षे), योगिता बोरुडे(वय ४० वर्षे) आणि कार ड्रायव्हर राजू शिंदे(वय २५ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला.


तर कारमधील किशोरी बोरूडे(वय १७ वर्षे) तसेच टेम्पोमधील धीरज कांतीलाल लोखंडे आणि श्रीराम बापूराव मांडे हे तीन जण जखमी झाले. जखमींना तातडीने रूग्णालयात नेले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला याचे कारण समोर आलेले नाही. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. तसेच अपघातातील मृत व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेले आहेत.

Comments
Add Comment

निवडणुकीच्या धामधुमीत जळगावात गोळीबार!

निवडणुकीशी संबंध नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या आनंद मंगल

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह