Manoj Jarange : लाठीचार्ज प्रकरणात न्याय दिला जाईल; मनोज जरांगेंशी देवेंद्र फडणवीस यांचा फोनवरुन संवाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आंदोलनकर्त्यांशी साधणार संवाद


मुंबई : जालना येथे मराठा समाजाच्या लोकांनी आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनावर (Jalna Maratha Andolan) पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा प्रश्न फारच चिघळला आहे. राज्यभरात याचे तीव्र प्रतिसाद उमटत आहेत. काही ठिकाणी रास्ता रोको, तर काही ठिकाणी गाड्यांची जाळपोळ करुन निषेध दर्शवला जात आहे. यामुळे एसटीच्याही अनेक ठिकाणी फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आंदोलनकर्त्यांचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी फडणवीसांनी त्यांना चर्चेचा प्रस्ताव दिला. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) देखील आज जालन्यात जाऊन आंदोलकांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.


काल बुलढाणा येथे झालेल्या 'शासन आपल्या दारी' (Shasan Aplya Dari) कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी घोषणा केली. त्यामुळे यावर तातडीने पावले उचलत ते आंदोलनकर्त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, फडणवीसांनी जरांगे यांना जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणात न्याय दिला जाईल, अशी ग्वाही दिली. त्याचबरोबर लवकरच मराठा आंदोलनाच्या नेत्यांशी चर्चा करण्यात येईल, असंही सरकारनं म्हटलं आहे.


या पार्श्वभूमीवर आज दुपारी मराठा आरक्षणविषयक कॅबिनेटच्या उपसमितीची बैठक पार पडणार असून यामध्ये आरक्षणासंबंधी चर्चा होईल. या बैठकीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मात्र, अजित पवार हे तीन दिवसांपासून कोणत्याही जाहीर सभेत सहभागी झालेले दिसले नाहीत. कालच्या कार्यक्रमातही आजारी असल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आज सलग तिसऱ्या दिवशी देखील अजितदादांचे सगळे कार्यक्रम राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे ते आजच्या बैठकीला उपस्थित राहणार का, हा प्रश्न आहे.



मनोज जरांगे यांचं आंदोलन आणखी तीव्र


उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची डॉक्टरांनी आज तपासणी केली. मात्र आजपासून पाणीही घेणार नसल्याची भूमिका घेत त्यांनी आपलं उपोषण आणखी तीव्र केलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, आम्ही सरकारचं ऐकतोय, प्रतिसाद देतोय, डॉक्टरांचंही ऐकतोय. सरकारने आज निर्णय घेतला नाही तर पाणीही घेणार नाही. मी आता तसं बोलण्याच्या मूडमध्ये नाही. सरकार शंभर टक्के प्रयत्न करतंय, बैठका घेत आहे. मी आणि माझा समाज सरकारला, डॉक्टरांना प्रतिसाद देणार आहे. शंभर टक्के निकाल लागेल. आज आम्हाला न्याय मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा