Nashik Kidnapping : थेट बांधकाम व्यावसायिकाच्या अपहरणाने नाशकात उडाली खळबळ!

  118

नाशिक शहरात गुन्हेगारीत वाढ


नाशिक : नाशिक शहरात हल्ली गुन्हेगारीच्या घटनांमध्ये (Nashik Crime) वाढ झाली आहे. त्यातच आता एक आणखी खळबळजनक बातमी समोर आली आहे. नाशिक शहरात थेट प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि गजरा ग्रुपचे प्रमुख हेमंत पारख (Hemant Parakh) यांचं अपहरण करण्यात आलं आहे. शहरातील इंदिरानगर भागात वास्तव्यास असलेल्या पारख यांचे राहत्या घरासमोरुन शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास अपहरण (Kidnapping) करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सध्या पोलीस पारख यांचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पारख यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.


काल रात्री पारख यांचं अपहरण झाल्याची बातमी परिसरात पसरली, त्यामुळे रहिवाशांनी ताबडतोब पोलिसांना घटनेबाबात कळवले. रात्रीपासूनच पोलिसांकडून पारख यांचा शोध सुरु आहे, मात्र आज सकाळपर्यंत शोध लागलेला नाही. परिसरातील सीसीटीव्ही तपासून पाहण्याचं काम सुरू आहे. तसेच शहरात अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. मात्र, रात्र उलटून गेली तरी पारख यांचा शोध न लागल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नाशिककर चांगलेच हादरून गेले आहेत. नाशिक पोलिसांकडून तपास सुरु असून या प्रकरणी ग्रामीण पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.



काल रात्री नेमकं काय झालं?


काल रात्रीच्या सुमारास हेमंत पारख हे घराबाहेर असताना अचानक काही अज्ञात इसम पारख यांच्या घरासमोर आले. या संशयितांनी पारख यांना चारचाकीत घालून पळ काढला. अपहरण झाल्याचे कळताच रहिवाशांनी पोलिसांना घटनेबाबत कळवले. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळावर पोहोचला. यानंतर परिसरातील सीसीटीव्ही तपासून अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली. काही संशयित चारचाकी तर काही दुचाकीवर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु अजूनही हेमंत पारख यांचे नेमक्या कोणत्या कारणासाठी अपहरण करण्यात आले, अपहरणकर्ते नेमके कोण आहेत, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित