Eknath Shinde : ज्या लोकांनी मराठा समाजाचा गळा दाबला तेच लोक आता गळा काढतायत

बुलढाण्यातून मुख्यमंत्री विरोधकांवर भडकले


जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही : मुख्यमंत्री


बुलढाणा : बुलढाणा येथे आज 'शासन आपल्या दारी' (Shasan Aplya Dari) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपस्थित राहिल्याने अनेक तर्क वितर्कांना उधाण आले होते. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) लडाखला व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आजारी असल्याने येऊ शकले नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी या चर्चांना विराम लावला. यावेळेस मुख्यमंत्र्यांनी जालना येथे मराठा आंदोलकांवर (Jalna Maratha Andolan) झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी दुःख व्यक्त केले. तसेच 'जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही', असं आश्वासन त्यांनी दिलं.


आज कार्यक्रमादरम्यान बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. 'ज्या लोकांनी मराठा समाजाचा गळा दाबला तेच लोक आता गळा काढतायत', अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं. महाविकास आघाडी सरकारमुळे सर्वोच्च न्यायालयातील आरक्षण रद्द झाल्याचा आरोप यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे. तर त्यावेळी मराठा समाजाच्या आरक्षण समितीमध्ये अशोक चव्हाण होते त्यांनी तेव्हा काय केलं, असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी अशोक चव्हाणांना विचारला आहे. महाविकास आघाडीने एकदाही मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केला नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.


यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. फक्त दाखवण्यसाठी आम्ही काम नाही करत, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सरकार आणि मी स्वस्थ बसणार नसल्याचं आश्वासन देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.



दोषींवर निलंबनाची कारवाई होणार


जालन्यातील पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. तसेच जे अतिरिक्त अधीक्षक आहेत त्यांना जिल्ह्याच्या बाहेर पाठवण्यात आलं आहे. योग्य ती चौकशी करुन या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच जर गरज पडली तर न्यायालयात देखील जाण्याची आमची तयारी आहे, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.



मराठा समाजाने कधीच कोणाला त्रास होऊ दिला नाही; पण तुम्ही...


पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा समाजाचे लाखो संख्येने मोर्चे निघायचे. पण या मोर्चाचा कधी कुणाला त्रास झाला नाही. त्यांनी कधीच कुणाला त्रास होऊ दिला नाही. मराठा समाज हा फार संयमी आहे. मराठा समाजाच्या मुकमोर्चाला तुम्ही मुका मोर्चा म्हणून संबोधलं हे जनता कधी विसरणार नाही.



३,५०० तरुणांना नोकऱ्या देण्याचं काम मी केलं


जेव्हा मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं तेव्हा ३,५०० तरुणांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांची निवड झाली होती पण नियुक्ती पत्र आली नव्हती. त्यावेळी कारवाई होईल म्हणून सगळ्यांना पाठ फिरवली. पण मी तेव्हा म्हटलं की काहीही होऊ दे पण मी मागे हटणार नाही. त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यावर त्या ३,५०० तरुणांना नोकऱ्या देण्याचं काम मी केलं, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा