नाशिक : जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक गेल्या चार दिवसांपासून उपोषण (Jalna Maratha Reservation Protest) करत आहेत. काल काही विघ्नसंतोषी लोकांनी या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलीस आणि आंदोलक यांच्यात हाणामारी झाली. अनेक पोलीस यात गंभीर जखमी झाले असून पोलिसांकडून उचलण्यात आलेल्या लाठीचार्ज व गोळीबाराच्या पावलामुळे राजकीय नेत्यांकडून तीव्र संतापाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण हे मिळालंच पाहिजे, ही आमच्या सर्वांची भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच आंदोलनास आमचा पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले आहे की, मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे, ही आमच्या सर्वांची भूमिका आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व आम्ही सर्वजण सरकारच्या वतीने न्यायालयीन लढाई ताकदीने लढत आहोत! राज्यात होणाऱ्या शांततामय आंदोलनास आम्हा सर्वांचा पाठिंबा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, “काल जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजबांधव शांततेत आंदोलन करत होते. त्यांच्यावर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्या व बळाचा वापर केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. काल झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी आमची ठाम भूमिका आहे. मुख्यमंत्री महोदयांनी तसे निर्देश दिले आहेत. मी राज्यातील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करतो व या लढाईत आम्ही सारे मराठा आंदोलकांसोबत आहोत, असे आश्वासित करतो!” छगन भुजबळ हे सध्या नाशिकमध्ये (Nashik) असून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…