पल्लेकल: आशिया चषकातील (asia cup 2023) ज्या सामन्याची चाहते इतक्या आतुरतेने वाट पाहत होते त्याने मात्र चाहत्यांची साफ निराशा केली. भारत (india) आणि पाकिस्तान (pakistan) यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यामुळे चाहते मात्र चांगलेच हिरमुसले आहेत.
भारताने या सामन्यात टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर संपूर्ण संघाला केवळ २६६ धावा करता आल्या. इशान किशनने ८१ चेंडूत ८२ धावा केल्या तर हार्दिक पांड्याने ९० चेंडूत ८७ धावांची खेळी केली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी केली. दरम्यान, या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा(११), विराट कोहली(४), शुभमन गिल(१०) आणि श्रेयस अय्यर (१४) स्वस्तात बाद झाले.
या सामन्यात पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि हारिस रऊफ यांचीच जादू पाहायला मिळाली. आफ्रिदीने ३१ धावा देत ४ विकेट घेतल्या तर हारिसने ५३ धावा देत ३ विकेट मिळवल्या.
भारताचा पुढील सामना नेपाळविरुद्ध रंगणार आहे. ४ सप्टेंबरला हा सामना रंगणार आहे. याआधी नेपाळचा सामना पाकिस्तानविरुद्ध झाला होता. त्या सामन्यात नेपाळला पाकिस्तानविरुद्ध २३८ धावांनी पराभव सहन करावा लागला होता.
पावसामुळे भारत आणि पाकिस्तान सामना रद्द झाला आहे. दोन्ही संघांना एकएक गुण देण्यात आला आहे. यासोबतच तीन गुणांसह पाकिस्तानचा संघ सुपर ४मध्ये पोहोचला आहे. अशातच सुपर ४मध्ये पोहोचण्यासाठी भारतीय संघाला नेपाळविरुद्धचा सामना जिंकावाच लागेल. त्यानंतर सुपर ४मध्ये पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात टक्कर होईल
प्रश्नपत्रिका तयार करतानाच घेणार 'ही' खास काळजी मुंबई : NEET PG परीक्षा रद्द झाल्यानंतर जवळपास…
यांचा वारीतला सहभाग केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपाच्या माजी खासदारांची विरोधकांवर बोचरी टीका सोलापूर : आषाढी…
आमदार नितेश राणे यांचा रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला कोणाची बुद्धी लहान याबाबत राहुल गांधी आणि…
भोलेबाबा करायचा दुधाची अंघोळ; खीर बनवून वाटला जायचा प्रसाद लखनऊ : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या…
गुंडांच्या साथीने पुण्यात डॉक्टरचे भयानक कृत्य पुणे : पुण्यात सातत्याने चित्रविचित्र गुन्हेगारीच्या घटना (Pune Crime)…
बालहक्क मंडळाकडे वकिलांमार्फत केला सादर पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत…