INDIA आघाडीला संयोजकाची सध्या गरज नाही, उद्धव ठाकरेंचे विधान

  149

मुंबई: मुंबईमध्ये विरोधी पक्षाच्या इंडिया (india) आघाडीच्या दोन दिवसांच्या बैठकीनंतर शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे (shivsena uddhav thackeray) यांनी आघाडीच्या संयोजकांबद्दल मोठे विधान केले आहे. ते म्हणाले सध्या आघाडीला संयोजकांची खास गरज नाही. आम्ही आपापसात सहमती करून १४ सदस्यांची कमिटी नियुक्त केली आहे.


उद्धव म्हणाले, या कमिटीचे सदस्य आघाडीशी संबंधित मुद्द्यांवर निर्णय घेतील आणि आपापल्या पक्षांच्या नेत्यांना याबाबत माहिती देतील. या समितीमध्ये काँग्रेसचे केसी वेणुगोपाल, एनसीपीचे शरद पवार, डीएमके के एमके स्टालिन, शिवसेनेचे संजय राऊत, आरजेडीचे तेजस्वी यादव, टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी, आपचे राघव चढ्ढा, सपाचे जावेद खान, जदयूचे लल्लन सिंह, जेएमएमचे हेमंत सोरेन, डी राजा, एनसीके उमर अब्दुल्ला आणि पीडीपीच्या मेहबूबा मुफ्की हे सामील आहेत.



जागावाटपावर लवकरच होणार चर्चा


या बैठकीत २०२३ची लोकसभा निवडणूक एनडीए विरुद्ध लढण्याचा संकल्प करण्यात आला आहे. दरम्यान, बैठकीत आघाडीच्या जागावाटपाबाबात कोणाचेही एकमत झाले नाही मात्र लवकरच राज्यातील जागा वाटपाची चर्चा सुर होईल. या दरम्यान आघाडीचे घोषवाक्य जुडेगा भारत, जीतेगा इंडिया हे जाहीर करण्यात आले.


इंडिया आघाडीच्या कॉर्डिनेशन कमिटी अँड इलेक्शन स्ट्रॅटेजी कमिटीशिवाय कँपेन कमिटीचीही निर्मितीही करण्यात आली. यात काँग्रेसचे गुरदीप सिंह सप्पल, जेडीयूचे संजय झा, आरजेडीचे संजय यादव, एसएसचे अनिल देसाई, एनसीपीचे पीसी चाको, जेएमएमचे चंपाई सोरेन, समाजवादी पक्षाचे किरणमय नंदा, आपचे संजय सिंह, सीपीआयएमचे अरूण कुमार, सीपीआयचे बिनॉय विश्वाम, नॅशनल कॉन्फरन्सचे जस्टिस हसनैन मसूदी, रालोदचे शाहीद सिद्दीकी, आरएसपीचे एमके प्रेमचंदन, एआयएफबीचे के जी देवराजन, सीपीआयएमएलचे रवी राय, वीसीकेचे तिरुमवलन, आययीएमएमएलचे केएल कामदर मोईदीन, केसीएमचे जोस के आणि टीएमसीच्या एका सदस्याचा समावेश आहे.


मुंबईत ३१ ऑगस्ट आणि एक सप्टेंबरला झालेल्या विरोधी पक्षांच्या आघाडीच्या बैठकीत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना म्हटले की जेव्हा मी लडाखला गेलो होतो तेव्हा मी स्वत: चीनच्या लोकांना तिथे पाहिले. लडाखच्या स्थानिक लोकांनी मला सांगितले की चीनबाबत पंतप्रधान मोदी खोटं बोलत आहेत. चीनने आमची जमीन ताब्यात घेतली आहे.

Comments
Add Comment

भिवंडीतून ३२ कोटी रुपयांचे MD जप्त, अंधेरीत परदेशी नागरिकाकडून १.१५ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने भिवंडीतून ३२ कोटी रुपयांचे एमडी (मेफेड्रोन) ड्रग (अमली पदार्थ) जप्त केले तर

रेशन दुकानदारांसाठी आनंदाची बातमी, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना

दहिसर टोल नाक्याची जागा बदलणार ? वेस्टर्न हॉटेलसमोर टोल नाक्याचे स्थलांतर करणार ?

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रांत प्रवेश करताना मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोल नाक्यामुळे

Mumbai Crime news : मुंबईच्या काळाचौकी परिसरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, ६ अल्पवयीन मुलांचे धक्कादायक कृत्य

मुंबई : दक्षिण मुंबईतील काळाचौकी परिसरातून हादरा बसणारी घटना समोर आली आहे. काळाचौकी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर

मुंबईत बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने केला घात, महिलेचा मृत्यू

मुंबई : मुंबईत सह्याद्री अतिथीगृहाजवळ बेस्टच्या इलेक्ट्रिक बसमुळे मॉर्निंग वॉक करत असलेल्या महिलेचा मृत्यू

मुंबईत दहीहंडीच्या सरावावेळी ११ वर्षांच्या गोविंदाचा मृत्यू

मुंबई : दहीहंडी या सणाला आता एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी उरला आहे. गोविंदा पथकांचा दहीहंडी फोडण्याचा सराव जोरात