Indian railway: १०५ वर्षात पहिल्यांदा महिला बनल्या रेल्वे चेअरमन, कोण आहेत जया वर्मा सिन्हा?

नवी दिल्ली : १०५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा एखाद्या महिलेकडे रेल्वेचे अध्यक्ष (railway board president) तसेच सीईओपद आले आहे. गुरूवारी जया वर्मा सिन्हाला (jaya verma sinha) भारतीय रेल्वेचे अध्यक्ष आणि सीईओ बनवण्यात आले. जया वर्मा सिन्हा १ सप्टेंबर २०२३ ला कार्यभार हाती घेतील. सिन्हा सध्याच्या वेळेस रेल्वे बोर्डाच्या सदस्य म्हणून काम करत आहे आणि त्यांनी भारतीय रेल्वेमध्ये कमीत कमी ३५ वर्षे सेवा केली आहे.


जया वर्मा सिन्हा प्रतिष्ठित इलाहाबाद युनिर्व्हसिटीच्या माजी विद्यार्थी आहेत. त्या १९८६मध्ये रेल्वेमध्ये कामास रुजू झाल्या. सिन्हा बोर्डाचे प्रमुख अनिल कुमार लाहोटी यांचे स्थान घेतील. विजयलक्ष्मी विश्ननाथन रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला सदस्य होत्या मात्र जया रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष असतील.


भारतीय रेल्वेला केंद्रीय बजेट २०२३-२४मध्ये २.४ लाख कोटी रूपयांचे बजेट मंजूर करण्यात आला आहे. हे राष्ट्रीय ट्रान्सपोर्टरला मिळालेले आतापर्यंतचे सर्वाधिक पॅकेज आहे.


जया वर्मा सिन्हा ओडिसाच्य बालासोर येथे झालेल्या कोरोमंडल एक्सप्रेसच्या अपघाताच्या वेळेस खूप कार्यरत होत्या. त्यांनी संपूर्ण घटनाक्रमावर नजर ठेवली होती. याशिवाय त्यांनी पीएमओला या घटनेबाबत पॉवर प्रेझेंटेशनही दिले होते. त्यांची सक्रियता आणि कार्यशैलीचे चांगले कौतुक झाले होते. आता सरकारनेही जया वर्मा सिन्हा यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले आहे.


Comments
Add Comment

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे

पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त महिलांना दिली खास भेट; सुरु केले 'हे' नवे अभियान

धार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे महिलांसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान'ची घोषणा

भारत धमक्यांना घाबरत नाही, घरात घुसून मारतो - पंतप्रधान मोदी

भोपाळ : “हा नवा भारत आहे, तो कोणत्याही अणुबॉम्बच्या धमक्यांपासून घाबरत नाही. हा नवा भारत घरात घुसून मारतो,” असे