Indian railway: १०५ वर्षात पहिल्यांदा महिला बनल्या रेल्वे चेअरमन, कोण आहेत जया वर्मा सिन्हा?

नवी दिल्ली : १०५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा एखाद्या महिलेकडे रेल्वेचे अध्यक्ष (railway board president) तसेच सीईओपद आले आहे. गुरूवारी जया वर्मा सिन्हाला (jaya verma sinha) भारतीय रेल्वेचे अध्यक्ष आणि सीईओ बनवण्यात आले. जया वर्मा सिन्हा १ सप्टेंबर २०२३ ला कार्यभार हाती घेतील. सिन्हा सध्याच्या वेळेस रेल्वे बोर्डाच्या सदस्य म्हणून काम करत आहे आणि त्यांनी भारतीय रेल्वेमध्ये कमीत कमी ३५ वर्षे सेवा केली आहे.


जया वर्मा सिन्हा प्रतिष्ठित इलाहाबाद युनिर्व्हसिटीच्या माजी विद्यार्थी आहेत. त्या १९८६मध्ये रेल्वेमध्ये कामास रुजू झाल्या. सिन्हा बोर्डाचे प्रमुख अनिल कुमार लाहोटी यांचे स्थान घेतील. विजयलक्ष्मी विश्ननाथन रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला सदस्य होत्या मात्र जया रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष असतील.


भारतीय रेल्वेला केंद्रीय बजेट २०२३-२४मध्ये २.४ लाख कोटी रूपयांचे बजेट मंजूर करण्यात आला आहे. हे राष्ट्रीय ट्रान्सपोर्टरला मिळालेले आतापर्यंतचे सर्वाधिक पॅकेज आहे.


जया वर्मा सिन्हा ओडिसाच्य बालासोर येथे झालेल्या कोरोमंडल एक्सप्रेसच्या अपघाताच्या वेळेस खूप कार्यरत होत्या. त्यांनी संपूर्ण घटनाक्रमावर नजर ठेवली होती. याशिवाय त्यांनी पीएमओला या घटनेबाबत पॉवर प्रेझेंटेशनही दिले होते. त्यांची सक्रियता आणि कार्यशैलीचे चांगले कौतुक झाले होते. आता सरकारनेही जया वर्मा सिन्हा यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले आहे.


Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी