Indian railway: १०५ वर्षात पहिल्यांदा महिला बनल्या रेल्वे चेअरमन, कोण आहेत जया वर्मा सिन्हा?

नवी दिल्ली : १०५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा एखाद्या महिलेकडे रेल्वेचे अध्यक्ष (railway board president) तसेच सीईओपद आले आहे. गुरूवारी जया वर्मा सिन्हाला (jaya verma sinha) भारतीय रेल्वेचे अध्यक्ष आणि सीईओ बनवण्यात आले. जया वर्मा सिन्हा १ सप्टेंबर २०२३ ला कार्यभार हाती घेतील. सिन्हा सध्याच्या वेळेस रेल्वे बोर्डाच्या सदस्य म्हणून काम करत आहे आणि त्यांनी भारतीय रेल्वेमध्ये कमीत कमी ३५ वर्षे सेवा केली आहे.


जया वर्मा सिन्हा प्रतिष्ठित इलाहाबाद युनिर्व्हसिटीच्या माजी विद्यार्थी आहेत. त्या १९८६मध्ये रेल्वेमध्ये कामास रुजू झाल्या. सिन्हा बोर्डाचे प्रमुख अनिल कुमार लाहोटी यांचे स्थान घेतील. विजयलक्ष्मी विश्ननाथन रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला सदस्य होत्या मात्र जया रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष असतील.


भारतीय रेल्वेला केंद्रीय बजेट २०२३-२४मध्ये २.४ लाख कोटी रूपयांचे बजेट मंजूर करण्यात आला आहे. हे राष्ट्रीय ट्रान्सपोर्टरला मिळालेले आतापर्यंतचे सर्वाधिक पॅकेज आहे.


जया वर्मा सिन्हा ओडिसाच्य बालासोर येथे झालेल्या कोरोमंडल एक्सप्रेसच्या अपघाताच्या वेळेस खूप कार्यरत होत्या. त्यांनी संपूर्ण घटनाक्रमावर नजर ठेवली होती. याशिवाय त्यांनी पीएमओला या घटनेबाबत पॉवर प्रेझेंटेशनही दिले होते. त्यांची सक्रियता आणि कार्यशैलीचे चांगले कौतुक झाले होते. आता सरकारनेही जया वर्मा सिन्हा यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले आहे.


Comments
Add Comment

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

PM Narendra Modi : जगात मोदींचीच हवा! पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत.

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे