IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल पाहा काय म्हणाला कर्णधार बाबर

  207

मुंबई: आशिया कप २०२३ची (asia cup 2023) सुरूवात पाकिस्तानने (pakistan) विजयासह केली आहे. कर्णधार बाबर आझम आणि इफ्तिखार अहमद यांच्या शतकी खेळीच्या जोरावर तसेच दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी झालेल्या २१४ धावांच्या भागीदारीच्या जोरावर पाकिस्तानने नेपाळवर जबरदस्त विजय मिळवला. नेपाळला पाकिस्तानने तब्बल २३८ धावांच्या फरकाने हरवले.


पाकिस्तानच्या या मोठ्या विजयानंतर कर्णधार बाबर आझमने खेळाडूंचे तोंडभरून कौतुक केले आणि भारताविरुद्धच्या सामन्याबाबतही मोठे विधान केले.



भारत-पाकिस्तान सामन्यावर काय म्हणाला बाबर?


पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम म्हणाला, आशिया कपच्या पहिल्या सामन्यात नेपाळविरुद्ध २३८ धावांनी मोठ्या विजयाने शनिवारी पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारताविरुद्धच्या बहुप्रतिक्षित सामन्याआधी आमच्या खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आहे. पाकिस्तानने ग्रुप एमध्ये कमकुवत नेपाळला २३८ धावांच्या मोठ्या अंतराने हरवत आशिया कपमध्ये विजयी सुरूवात केली. पाकिस्तान आता भारताविरुद्ध सामना खेळण्यासाठी पल्लेकलमध्ये खेळण्यासाठी श्रीलंकेत जाणार आहे.



बाबर आझमने सामन्यानंतर केले हे विधान


बाबरने सामना संपल्यानंंतर म्हटले की, हासामना भारताविरुद्धच्या सामन्याआधीची चांगली तयारी होती. कारण यामुळे आमचा आत्मविश्वास उंचावला. आम्हाला प्रत्येक सामन्यात १०० टक्के द्यायचे आहेत.



पाकिस्तानचा मोठा स्कोर


पाकिस्तानने नेपाळविरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना सहा बाद ३४३ धावांचा मोठा स्कोर केला. बाबर आझमने १३१ चेंडूत १४ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने १५१ धावा केल्या.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार