नवी दिल्ली : संसदेचं (Parliament) नुकतंच पावसाळी अधिवेशन (Monsoon session) पार पडलेलं असताना काही दिवसांत अचानक पुन्हा पाच दिवसांचं विशेष सत्र (Special Session) बोलावण्यात आलेलं आहे. या विशेष सत्रामध्ये दहापेक्षा जास्त बिलं संसदेत सादर केली जाणार आहेत. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांनी आज एक्सवर ट्वीट करुन याबद्दल माहिती दिली आहे. हे सत्र १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान बोलावण्यात आलेलं आहे.
पावसाळी अधिवेशनानंतर हिवाळी अधिवेशन होते. मात्र त्यापूर्वीच संसदेचे विशेष सत्र घेऊन नेमकी काय विधेयकं मंजूर करण्यात येणार आहेत, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या विशेष सत्रात ५ बैठका होणार आहेत. दरम्यान, या विधेयकांबद्दल माहिती मिळू शकलेली नाही.
संसदेचं पावसाळी अधिवेशन २० जुलै ते ११ ऑगस्टपर्यंत चाललं होतं. यादरम्यान मणिपूरमधील हिंसाचारावर दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. पंतप्रधान मोदींनी मणिपूरमधील हिंसाचारासंदर्भात उत्तर द्यावं यासाठी विरोधकांनी मोदी सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणला होता. अखेर मोदींनी सभागृहात मणिपूर हिंसाचारावर उत्तर दिलं, तसेच त्यांनी काँग्रेसवर आणि विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियावरही हल्ला चढवला होता. त्यानंतर आता या विशेष सत्राकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…