नवी दिल्ली : संसदेचं (Parliament) नुकतंच पावसाळी अधिवेशन (Monsoon session) पार पडलेलं असताना काही दिवसांत अचानक पुन्हा पाच दिवसांचं विशेष सत्र (Special Session) बोलावण्यात आलेलं आहे. या विशेष सत्रामध्ये दहापेक्षा जास्त बिलं संसदेत सादर केली जाणार आहेत. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांनी आज एक्सवर ट्वीट करुन याबद्दल माहिती दिली आहे. हे सत्र १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान बोलावण्यात आलेलं आहे.
पावसाळी अधिवेशनानंतर हिवाळी अधिवेशन होते. मात्र त्यापूर्वीच संसदेचे विशेष सत्र घेऊन नेमकी काय विधेयकं मंजूर करण्यात येणार आहेत, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या विशेष सत्रात ५ बैठका होणार आहेत. दरम्यान, या विधेयकांबद्दल माहिती मिळू शकलेली नाही.
संसदेचं पावसाळी अधिवेशन २० जुलै ते ११ ऑगस्टपर्यंत चाललं होतं. यादरम्यान मणिपूरमधील हिंसाचारावर दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. पंतप्रधान मोदींनी मणिपूरमधील हिंसाचारासंदर्भात उत्तर द्यावं यासाठी विरोधकांनी मोदी सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणला होता. अखेर मोदींनी सभागृहात मणिपूर हिंसाचारावर उत्तर दिलं, तसेच त्यांनी काँग्रेसवर आणि विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियावरही हल्ला चढवला होता. त्यानंतर आता या विशेष सत्राकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…
मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…
मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…
मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…
मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत (SRA scheme) घरांच्या विक्रीसाठीचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) आता ऑनलाइन देण्यात…