Parliament Session : मोठी बातमी! हिवाळी अधिवेशनापूर्वीच संसदेत बोलावलं पाच दिवसांचं विशेष सत्र

नवी दिल्ली : संसदेचं (Parliament) नुकतंच पावसाळी अधिवेशन (Monsoon session) पार पडलेलं असताना काही दिवसांत अचानक पुन्हा पाच दिवसांचं विशेष सत्र (Special Session) बोलावण्यात आलेलं आहे. या विशेष सत्रामध्ये दहापेक्षा जास्त बिलं संसदेत सादर केली जाणार आहेत. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांनी आज एक्सवर ट्वीट करुन याबद्दल माहिती दिली आहे. हे सत्र १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान बोलावण्यात आलेलं आहे.


पावसाळी अधिवेशनानंतर हिवाळी अधिवेशन होते. मात्र त्यापूर्वीच संसदेचे विशेष सत्र घेऊन नेमकी काय विधेयकं मंजूर करण्यात येणार आहेत, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या विशेष सत्रात ५ बैठका होणार आहेत. दरम्यान, या विधेयकांबद्दल माहिती मिळू शकलेली नाही.


संसदेचं पावसाळी अधिवेशन २० जुलै ते ११ ऑगस्टपर्यंत चाललं होतं. यादरम्यान मणिपूरमधील हिंसाचारावर दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. पंतप्रधान मोदींनी मणिपूरमधील हिंसाचारासंदर्भात उत्तर द्यावं यासाठी विरोधकांनी मोदी सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणला होता. अखेर मोदींनी सभागृहात मणिपूर हिंसाचारावर उत्तर दिलं, तसेच त्यांनी काँग्रेसवर आणि विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियावरही हल्ला चढवला होता. त्यानंतर आता या विशेष सत्राकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण