रिटायर व्हा, आता वय झालंय, सायरस पुनावाला यांचा शरद पवारांना सल्ला

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार (sharad pawar) भले २०२४मध्ये भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षाची आघाडी I.N.D.I.A मध्ये महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. मात्र त्यांचे घनिष्ठ मित्र आणि उद्योगपती सायरस पुनावालाने त्यांना राजकारणातून निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला आहे. भारताचे लसीकरणाचचे सम्राट म्हटले जाणारे सायरस पुनावला यांनी मीडियाशी बोलताना चांद्रयान ३च्या यशस्वी लँडिंगबद्दल इस्त्रोचे कौतुक केले.


यावेळी पत्रकारांनी त्यांना शरद पवार यांच्याबद्दल सवाल केले. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, शरद पवार खूप हुशार व्यक्ती आहेत. ते देशाचे मोठी सेवा करू शकत होते. पुनावाला पुढे म्हणाले, आता त्यांचे वय झाले आहे त्यांनी आता निवृत्त झाले पाहिजे.


सिरम इन्स्टिट्यूटचे चेअरमन सायरस पुनावाला मीडियाशी संवाद साधत होते. एकाएकी जेव्हा एनसीपी प्रमुख शरद पवार यांच्याबाबत त्यांना सवाल केला तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. शरद पवारांबद्दल बोलताना म्हणाले, त्यांना दोन वेळा पंतप्रधान बनण्याची संधी मिळाली होती. जी त्यांनी गमावली. ते एक बुद्धिमान व्यक्ती आहेत ते राष्ट्राची सेवा करू शकत होते. आता त्यांचे वय झाले आहे. त्यांनी आता सेवानिवृत्ती घेतली पाहिजे.


राजकारणात सहा दशकांपेक्षा अधिक वर्षे काम करणाऱ्या शरद पवार यांना गेल्या महिन्यात पुतणे अजित पवार यांच्या टीकेवर त्यांनी राजकारणातून निवृत्त होण्यास मनाई केली होती.

Comments
Add Comment

Poisonous Snakes : मान्सूनमध्ये वाढतो 'या' ४ सापांचा वावर; कोणते आहेत हे जीवघेणे सर्प?

मुंबई : पावसाळा सुरू होताच निसर्ग हिरवागार होतो, मात्र त्याचवेळी विषारी सापांचा (Poisonous Snakes) वावरही मोठ्या प्रमाणात

Mhada: म्हाडातर्फे १३ जुलै रोजी १९ वा लोकशाही दिन साजरा होणार

मुंबई(Mumbai) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (Mhada) एकोणीसावा लोकशाही दिन सोमवार १३ जुलै २०२६

Government of Maharashtra : 'आपत्तीवर वॉर मोड'! पावसाळी संकटाशी लढण्यासाठी महाराष्ट्र शासन सज्ज; मोशी, पालघरसह राज्यभर बचावकार्य वेगात

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर, भूस्खलन आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या

Water Management : धरण ओव्हरफ्लो, तरी पाणीटंचाई कायम!

मुंबई(Mumbai) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रांत पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे धरणातील

Weather Update : बंगालच्या उपसागरातील ढग निवळले,राज्यातील पावसाचा जोर ओसरणार; पुणे, सातारा घाटमाथ्याला 'ऑरेंज अलर्ट'

मुंबई(Mumbai) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थैमान घालणाऱ्या पावसाचा जोर आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र,

Central Railway : लोणावळा–कर्जत रेल्वेमार्गावरील भूस्खलनाचा मोठा परिणाम! डेक्कन क्वीनसह अनेक एक्सप्रेस गाड्या १७ जुलैपर्यंत रद्द

मुंबई : मुसळधार पावसामुळे लोणावळा–कर्जत घाट विभागात झालेल्या भीषण भूस्खलनाचा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला