Chandrayaan-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर घेतला ऑक्सिजनचा शोध, प्रज्ञानची कमाल

नवी दिल्ली : 'चांद्रयान ३' (chandrayaan 3) च्या प्रज्ञान रोव्हरमध्ये लावलेल्या एका यंत्राने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजन असल्याचे शोधले आहे. हे काम त्यातील पेलोड म्हणजेच लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोपीने केले आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान ३चे पहिले इन सीटू प्रयोग होता. याशिवाय तेथे हायड्रोजन आहे का याचाही शोध घेतला जात आहे. जर ऑक्सिजननंतर हायड्रोजन आढळला तर चंद्रावर पाणी बनणे सोपे होईल.


लिब्स चंद्राच्या पृष्ठभागावर पडणाऱ्या तीव्र लेझर किरेणे टाकत त्याचा अभ्यास करते. ही लेझर किरणे अधिक तीव्रतेने दगड अथवा मातीवर पडतात. ज्यामुळे तेथे गरम प्लाम्झा तयार होतात. प्लाझ्मामधून निघणारा प्रकाश हे सांगतो की या पृष्ठभागावर कोणत्या प्रकारची खनिजे आहेत.





चंद्राच्या पृष्ठभागावर अनेक प्रकारच्या खनिजांचा शोध लागला आहे. अॅल्युमिनियम, कॅल्शियम, आर्यन, क्रोमियम, टायटेनियम तसेच मँगनीज, सिलिकॉन आणि ऑक्सिजनचा शोध लागला आहे.


याआधी २८ ऑगस्टला चांद्रयान ३च्या विक्रम लँडरमध्ये लावलेल्या चास्टे पेलोडने चंद्राच्या तापमानाबाबतचे पहिले ऑब्जर्व्हेशन ाठवले होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील तापमान ५० डिग्री सेल्सियस आहे. तर ८० मिमीच्या खोलीमध्ये -१० डिग्री सेल्सियस इतके आहे.


प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर योग्य पद्धतीने काम रत आहे. रोव्हरवर दोन पेलोड्स लागले आहेत. पहिला लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्को. हा एलिमेंट कंपोझिशन स्टडी करणार. जसे मॅग्नेशियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, जस्त आणि लोह.


दुसरे पेलोड आहे अल्फा पार्टिकल एक्स रे स्पेक्ट्रोमीटर. हा चंद्राच्या पृष्ठभागावर असलेले केमिकल्स म्हणजेच रसायनांची मात्रा आणि गुणवत्तेचा अभ्यास करणार आहे. सोबतच खनिजांचा शोध घेतला जात आहे.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी