मान्सूनवर अल निनोचा परिणाम! १२२ वर्षात सगळ्यात कोरडा ऑगस्ट

मुंबई : वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञांच्या मते भारतात १९०१ नंतर या वर्षातील ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक कोरडा असण्याची शक्यता आहे. हा परिणाम अल निनोमुळे झाला आहे. याशिवाय या वर्षी मान्सून २०१५ नंतर अधिक कोरडा असू शकतो. ज्यात १३ टक्के कमी पाऊस झाला आहे.


भारतीय हवामान विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले ऑगस्टमध्ये आतापर्यंत ३२ टक्के पाऊस कमी झाला आहे. १९०१ सालानंतर भारतातील हा सर्वात कोरडा ऑगस्ट महिना आहे. ऑगस्टमध्ये २५४.९ मिमी पाऊस होतो जो एकूण पावसाच्या ३० टक्के इतका आहे.


हवामान विभागाच्या माहितीनुसार भारतात ऑगस्ट २००५मध्ये २५ टक्के, १९६५मध्ये २४.६ टक्के, १९२०मध्ये २४.४ टक्के, २००९मध्ये २४.१ टक्के आणि १९१३मध्ये २४ टक्के इतका कमी पाऊस झाला होता.


आयएमडीचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की ऑगस्टमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याचे मुख्य कारण अल निनोचा प्रभाव आहे. पावसाचा जोर कमी असण्याची ही स्थिती एका महिन्यापासून आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये पावसाची कामगिरी महत्त्वाची असणार आहे. तसेच काही दिवसांनी भारताच्या काही भागात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.



जुलै २००२मध्ये पावसामध्ये ५०.६६ टक्के झाली होती घट


आयएमडीचे प्रमुख मृत्युंजय महापात्र म्हणाले, आम्ही २ सप्टेंबरला पावसामध्ये सुधारणेची अपेक्षा करत. कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याने भारताच्या पूर्व, मध्य आणि दक्षिण भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. या वर्षी ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी राहिले. याआधी २००२मध्ये जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण घटले होते. त्यावर्षी जुलैमध्ये पावसाच्या प्रमाणात ५०.६ टक्के घट झाली होती.

Comments
Add Comment

अशी झाली जगप्रसिद्ध लूव्ह्र संग्रहालय येथे चोरी !

पॅरिस : जगप्रसिद्ध लूव्ह्र संग्रहालय येथे घडलेल्या चोरीने जगभरात खळबळ उडाली आहे. सकाळी संग्रहालय उघडलेलं असताना

कर्नूल बस अपघात : स्मार्टफोन बॅटरी फुटल्यामुळे आग, १९ प्रवासी मृत्युमुखी

कर्नूल : आंध्र प्रदेशमधील कर्नूलमध्ये शुक्रवारी सकाळी झालेल्या बस अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातात

भारताचा पाकिस्तान सीमेवर युद्धाभ्यास

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने मोठ्या युद्धाभ्यासाची तयारी सुरू केली आहे. पाकिस्तानच्या सीमेलगत भारतीय सैन्य

८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठुभक्ताची पंढरपूर वारी

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ बेळगाव : पौराणिक कथेप्रमाणे कर्नाटकातही आधुनिक श्रावणबाळ असल्याचं दिसून आलं आहे.

Eknath Shinde in Delhi : मोठी ब्रेकिंग! मध्यरात्री उपमुख्यमंत्री शिंदेंची अचानक 'दिल्लीवारी'; महायुतीत नेमकी कोणती नवी 'राजकीय घडामोड'? कारण आलं समोर...

नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्यरात्री तातडीने दिल्ली गाठल्यामुळे (Delhi Visit) राजकीय वर्तुळात

आता एक नाही तर चारजणांना करू शकता नॉमिनी, १ नोव्हेंबरपासून बॅंकेचा नियम होणार लागू

बॅंकेमध्ये आता एकाऐवजी चार जणांना नॉमिनी म्हणून जोडता येणार असल्याची मोठी घोषणा अर्थ मंत्रालयाकडून करण्यात