मान्सूनवर अल निनोचा परिणाम! १२२ वर्षात सगळ्यात कोरडा ऑगस्ट

मुंबई : वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञांच्या मते भारतात १९०१ नंतर या वर्षातील ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक कोरडा असण्याची शक्यता आहे. हा परिणाम अल निनोमुळे झाला आहे. याशिवाय या वर्षी मान्सून २०१५ नंतर अधिक कोरडा असू शकतो. ज्यात १३ टक्के कमी पाऊस झाला आहे.


भारतीय हवामान विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले ऑगस्टमध्ये आतापर्यंत ३२ टक्के पाऊस कमी झाला आहे. १९०१ सालानंतर भारतातील हा सर्वात कोरडा ऑगस्ट महिना आहे. ऑगस्टमध्ये २५४.९ मिमी पाऊस होतो जो एकूण पावसाच्या ३० टक्के इतका आहे.


हवामान विभागाच्या माहितीनुसार भारतात ऑगस्ट २००५मध्ये २५ टक्के, १९६५मध्ये २४.६ टक्के, १९२०मध्ये २४.४ टक्के, २००९मध्ये २४.१ टक्के आणि १९१३मध्ये २४ टक्के इतका कमी पाऊस झाला होता.


आयएमडीचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की ऑगस्टमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याचे मुख्य कारण अल निनोचा प्रभाव आहे. पावसाचा जोर कमी असण्याची ही स्थिती एका महिन्यापासून आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये पावसाची कामगिरी महत्त्वाची असणार आहे. तसेच काही दिवसांनी भारताच्या काही भागात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.



जुलै २००२मध्ये पावसामध्ये ५०.६६ टक्के झाली होती घट


आयएमडीचे प्रमुख मृत्युंजय महापात्र म्हणाले, आम्ही २ सप्टेंबरला पावसामध्ये सुधारणेची अपेक्षा करत. कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याने भारताच्या पूर्व, मध्य आणि दक्षिण भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. या वर्षी ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी राहिले. याआधी २००२मध्ये जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण घटले होते. त्यावर्षी जुलैमध्ये पावसाच्या प्रमाणात ५०.६ टक्के घट झाली होती.

Comments
Add Comment

फ्लाइट तिकीट रद्द करण्यावर आता शुल्क लागणार नाही; डीजीसीएने केला रिफंड नियमांमध्ये मोठा बदल

नवी दिल्ली :  विमान प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता विमान प्रवाशांना प्रवासी बुकिंगच्या ४८ तासांच्या

R. Nallakannu : तामिळनाडूतील सीपीआय नेते स्वातंत्र्यसैनिक नल्लाकन्नू यांचे १०१ व्या वर्षी निधन

स्वातंत्र्यसैनिक आणि तामिळनाडूमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) ज्येष्ठ नेते आर. नल्लाकन्नू यांचे

PM Modi Israel Visit : इस्रायलच्या संसदेकडून पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च बहुमान

- हा बहुमान मिळणारे ठरले पहिले भारतीय पंतप्रधान तेल अवीव : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार २५ फेब्रुवारी रोजी

Odisha News : भ्रष्टाचाराविरोधी मोठी कारवाई! खाण अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ४ कोटींची रोकड जप्त

ओडिशा : भ्रष्टाचाराविरोधातील कारवायांमध्ये ओडिशा राज्यात मोठी धडक कारवाई समोर आली आहे. ओडिशा दक्षता विभागाने

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरमालक-भाडेकरूंसाठी 'हे' नवे नियम लागू

नवी दिल्ली : कर वजावटीत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट दावे रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्राप्तिकर

EPFO 3.0: PF क्लेम आता 3 दिवसांत पूर्ण होणार, कसं ते जाणून घेऊया...

नवी दिल्ली: देशातील लाखो नोकरदारांसाठी श्रम मंत्रालयाने 'EPFO 3.0' ही अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना सुरू केली