मान्सूनवर अल निनोचा परिणाम! १२२ वर्षात सगळ्यात कोरडा ऑगस्ट

मुंबई : वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञांच्या मते भारतात १९०१ नंतर या वर्षातील ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक कोरडा असण्याची शक्यता आहे. हा परिणाम अल निनोमुळे झाला आहे. याशिवाय या वर्षी मान्सून २०१५ नंतर अधिक कोरडा असू शकतो. ज्यात १३ टक्के कमी पाऊस झाला आहे.


भारतीय हवामान विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले ऑगस्टमध्ये आतापर्यंत ३२ टक्के पाऊस कमी झाला आहे. १९०१ सालानंतर भारतातील हा सर्वात कोरडा ऑगस्ट महिना आहे. ऑगस्टमध्ये २५४.९ मिमी पाऊस होतो जो एकूण पावसाच्या ३० टक्के इतका आहे.


हवामान विभागाच्या माहितीनुसार भारतात ऑगस्ट २००५मध्ये २५ टक्के, १९६५मध्ये २४.६ टक्के, १९२०मध्ये २४.४ टक्के, २००९मध्ये २४.१ टक्के आणि १९१३मध्ये २४ टक्के इतका कमी पाऊस झाला होता.


आयएमडीचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की ऑगस्टमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याचे मुख्य कारण अल निनोचा प्रभाव आहे. पावसाचा जोर कमी असण्याची ही स्थिती एका महिन्यापासून आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये पावसाची कामगिरी महत्त्वाची असणार आहे. तसेच काही दिवसांनी भारताच्या काही भागात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.



जुलै २००२मध्ये पावसामध्ये ५०.६६ टक्के झाली होती घट


आयएमडीचे प्रमुख मृत्युंजय महापात्र म्हणाले, आम्ही २ सप्टेंबरला पावसामध्ये सुधारणेची अपेक्षा करत. कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याने भारताच्या पूर्व, मध्य आणि दक्षिण भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. या वर्षी ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी राहिले. याआधी २००२मध्ये जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण घटले होते. त्यावर्षी जुलैमध्ये पावसाच्या प्रमाणात ५०.६ टक्के घट झाली होती.

Comments
Add Comment

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च

Bhopal News: कारमध्ये अडकलेला दीड वर्षांचा चिमुकला,अन् आई वडील शॅापिंगला गेले,पुढे असं घडलं...

भोपाळ :मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात संध्याकाळच्या सुमारास पाया खालची जमीन हलवणारी घटना घडली. पालकांच्या

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ