मान्सूनवर अल निनोचा परिणाम! १२२ वर्षात सगळ्यात कोरडा ऑगस्ट

मुंबई : वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञांच्या मते भारतात १९०१ नंतर या वर्षातील ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक कोरडा असण्याची शक्यता आहे. हा परिणाम अल निनोमुळे झाला आहे. याशिवाय या वर्षी मान्सून २०१५ नंतर अधिक कोरडा असू शकतो. ज्यात १३ टक्के कमी पाऊस झाला आहे.


भारतीय हवामान विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले ऑगस्टमध्ये आतापर्यंत ३२ टक्के पाऊस कमी झाला आहे. १९०१ सालानंतर भारतातील हा सर्वात कोरडा ऑगस्ट महिना आहे. ऑगस्टमध्ये २५४.९ मिमी पाऊस होतो जो एकूण पावसाच्या ३० टक्के इतका आहे.


हवामान विभागाच्या माहितीनुसार भारतात ऑगस्ट २००५मध्ये २५ टक्के, १९६५मध्ये २४.६ टक्के, १९२०मध्ये २४.४ टक्के, २००९मध्ये २४.१ टक्के आणि १९१३मध्ये २४ टक्के इतका कमी पाऊस झाला होता.


आयएमडीचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की ऑगस्टमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याचे मुख्य कारण अल निनोचा प्रभाव आहे. पावसाचा जोर कमी असण्याची ही स्थिती एका महिन्यापासून आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये पावसाची कामगिरी महत्त्वाची असणार आहे. तसेच काही दिवसांनी भारताच्या काही भागात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.



जुलै २००२मध्ये पावसामध्ये ५०.६६ टक्के झाली होती घट


आयएमडीचे प्रमुख मृत्युंजय महापात्र म्हणाले, आम्ही २ सप्टेंबरला पावसामध्ये सुधारणेची अपेक्षा करत. कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याने भारताच्या पूर्व, मध्य आणि दक्षिण भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. या वर्षी ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी राहिले. याआधी २००२मध्ये जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण घटले होते. त्यावर्षी जुलैमध्ये पावसाच्या प्रमाणात ५०.६ टक्के घट झाली होती.

Comments
Add Comment

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे

Amaravati Capital : 'अमरावती' आता आंध्र प्रदेशची 'कायमस्वरूपी' राजधानी; केंद्राचे गॅझेट नोटिफिकेशन जारी!

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने

Rajnath Singh : "पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहिलं तर..."; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या भडकाऊ वक्तव्याला जोरदार