Jay Pawar : अजितदादांचे पुत्र जय पवार पाहतायत दादांच्या सिग्नलची वाट; राजकारणात होणार का सक्रिय?

  100

काय म्हणाले जय पवार?


बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीत (NCP) बंड केल्यापासून राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या. काहीजणांनी अजितदादांसोबत सरकारची साथ दिली तर काहीजणांनी शरद पवारांसोबत (Sharad Pawar) राहणे पसंत केले. यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून आता राष्ट्रवादीचे भविष्य काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, अजितदादांचे दोन्ही पुत्र आता राजकारणात उतरण्याची चिन्हे देखील निर्माण झाली आहेत. अजितदादांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) हे तर राजकारणात सक्रिय होतेच मात्र आता जय पवार (Jay Pawar) देखील मैदानात उतरण्याच्या मार्गावर आहेत. 'तुम्ही दादांशी बोलून घ्या, त्यांनी मला सिग्नल दिला की, मी लगेच तयार आहे,' असं विधान करत त्यांनी त्यांच्या एण्ट्रीचा संकेतच दिला आहे.


बारामतीत शनिवारी अजितदादांच्या झालेल्या जाहीर सभेत त्यांच्यासोबत पार्थ पवार देखील होते. त्यानंतर आज जय पवार बारामतीत आले होते. त्यांनी बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाला सदिच्छा भेट दिली व कार्यालयाची पाहणी केली. महिला कार्यकर्त्यांनी जय पवार यांचं औक्षण करत त्यांचं स्वागत केलं. यावेळी मी तुमच्या सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे, असं जय पवार म्हणाले.


जय पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची संवाद साधत असताना 'दादा तुम्ही आता बारामतीत ऍक्टिव्ह व्हायला हवे, आपल्याला अजितदादांना मुख्यमंत्री करायचे आहे, त्यामुळे तुम्ही आता बारामतीत यायला पाहिजे', असा प्रेमळ आग्रह बारामतीतील कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. यासंदर्भात तुम्ही अजितदादांना विचारा त्यांनी ग्रीन सिग्नल दिला की मी लगेच कामाला लागतो, असं उत्तर जय पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलं. त्यांच्या या उत्तरामुळे जय पवारही लवकरच राजकारणात दिसणार असा संकेत मिळाला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत