मुंबई : अवघ्या काही दिवसांवर गणेश चतुर्थी आली असून संपूर्ण भारतभर गणेशोत्सव (Eco-friendly Ganeshotsav) हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. सगळ्यांचा उत्साह आता जोरदार वाढला असून यात बॉलीवूडचा अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) देखील मागे नाही. तो दरवर्षी पर्यावरणपूरक दृष्टीकोनाचा विचार करून हा सण खास पद्धतीने साजरा करतो.
टिकाऊ साहित्य वापरून गणपतीच्या मूर्ती तयार करून तो हा सण साजरा करणार असल्याचं समजतंय या मधून त्यांच्या पर्यावरणाशी असलेली बांधिलकी देखील दिसून येते.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने आपला दृष्टिकोन मांडला, “मी दरवर्षी स्वतःच्या हाताने गव्हाच्या पिठाने गणपतीची मूर्ती बनवतो. खूप मजा येते. मी राजमा बीन्स वापरून डोळे बनवतो आणि मसूर आणि इतर डाळी वापरून दागिने बनवतो. मग मी त्यांना हळदीचा वापर करून रंग देतो आणि हे करण्यात एक वेगळ सुख आहे.”
राजकुमार राव हा बायोडिग्रेडेबल मटेरियल आणि नैसर्गिक रंग वापरून अनोख्या पद्धतीने हा उत्सव पर्यावरण पूरक साजरा करतो. राजकुमार राव याचे पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्ती बनवण्याचे समर्पण ही सगळ्यांना एक प्रेरणा देऊन जाणार आहे.
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…