Sangali : आश्रमशाळेतील १७० विद्यार्थ्यांना बासुंदीतून विषबाधा!

डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातील शिल्लक अन्न बाधले


सांगली : सांगलीमधील (Sangali) जत तालुक्यातील उमदी येथील आश्रमशाळेतील १७० विद्यार्थ्यांना बासुंदीतून विषबाधा झाली आहे.


जेवणानंतर या विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळीचा त्रास सुरू झाला होता. विषबाधा झालेल्या मुलांमध्ये पाच ते पंधरा वर्षांपर्यंतच्या वयोगटातील मुलांचा समावेश आहे. त्यानंतर त्यांना तातडीने माडग्याळमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यामुळे सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. परंतु अद्याप देखील ७९ विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.


उमदी येथे विमुक्त आणि भटक्या जमातीतील प्रवर्गातील समता अनुदानित आश्रमशाळा चालवली जाते. जवळपास दोनशेच्या आसपास विद्यार्थी या शाळेमध्ये आहेत. यावेळी या विद्यार्थ्यांना एका डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातील शिल्लक अन्न दिले गेले. त्यामध्ये बासुंदी होती. त्यामुळे आश्रमशाळेतील १७० विद्यार्थ्यांना बासुंदीतून विषबाधा झाली.


दरम्यान, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी या घटनेचे गांभीर्य़ लक्षात घेत तात्काळ या प्रकरणाची दखल घेतली आहे. तसेच संपूर्ण घटनेची चौकशी करून २४ तासाच्या आत अहवाल सादर करण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

अमरावती जिल्ह्यात नक्की चाललंय तरी काय? अखेरच्या क्षणी भाजपची मोठी खेळी

अमरावती : राज्यात काही दिवसांपूर्वीच महापालिकांच्या निवडणुकांचा गुलाल हा उधळला गेला. सत्ताधारी आणि विरोधक

Nashik Mayor : ठरलं तर मग! नाशिकमध्ये महापौर भाजपचा होणार, तर उपमहापौर...?

नाशिक : नाशिकच्या राजकारणात आज एक मोठी आणि ऐतिहासिक घडामोड पाहायला मिळाली. नाशिक महानगरपालिकेच्या

मुलतानी बेकरीच्या मालकाने उचलेले टोकाचे पाऊल; सोलापुरात खळबळ

सोलापूर: सोलापुरात एकेकाळी अत्यंत प्रसिद्ध असलेल्या मुलतानी बेकरीचे मालक सुनील मोतीलाल सदारंगानी यांनी

Mumbai Pune Expressway: तिसऱ्या दिवशीही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे जैसे थे..; प्रवाशी हतबल

मुंबई: आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी पहाटेपासूनच मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी झाल्याने

HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी; HSRP नंबर प्लेट बसवली नाही तर...

वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. तुम्ही जर अजूनही तुमच्या गाडीला नवीन नंबरप्लेट बसवून घेतली नसेल तर तुमचे

Jalna Black Magic News: जालन्यात एका हॉटेलसमोर लिंबू आणि बाहुल्या आढळल्या, काळ्या जादूने गावात खळबळ

जालना: जालना जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोकरदन तालुक्यामध्ये एका अज्ञात महिलेने हॉटेलसमोर