Sangali : आश्रमशाळेतील १७० विद्यार्थ्यांना बासुंदीतून विषबाधा!

डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातील शिल्लक अन्न बाधले


सांगली : सांगलीमधील (Sangali) जत तालुक्यातील उमदी येथील आश्रमशाळेतील १७० विद्यार्थ्यांना बासुंदीतून विषबाधा झाली आहे.


जेवणानंतर या विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळीचा त्रास सुरू झाला होता. विषबाधा झालेल्या मुलांमध्ये पाच ते पंधरा वर्षांपर्यंतच्या वयोगटातील मुलांचा समावेश आहे. त्यानंतर त्यांना तातडीने माडग्याळमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यामुळे सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. परंतु अद्याप देखील ७९ विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.


उमदी येथे विमुक्त आणि भटक्या जमातीतील प्रवर्गातील समता अनुदानित आश्रमशाळा चालवली जाते. जवळपास दोनशेच्या आसपास विद्यार्थी या शाळेमध्ये आहेत. यावेळी या विद्यार्थ्यांना एका डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातील शिल्लक अन्न दिले गेले. त्यामध्ये बासुंदी होती. त्यामुळे आश्रमशाळेतील १७० विद्यार्थ्यांना बासुंदीतून विषबाधा झाली.


दरम्यान, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी या घटनेचे गांभीर्य़ लक्षात घेत तात्काळ या प्रकरणाची दखल घेतली आहे. तसेच संपूर्ण घटनेची चौकशी करून २४ तासाच्या आत अहवाल सादर करण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध