Mann ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात'चा १०४वा भाग, चांद्रयानच्या मोहिमेवर चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) आज आपल्या मन की बात (mann ki baat) या रेडिओ कार्यक्रमाच्या १०४व्या भागात बोलणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रसारण सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया ट्विटरवरून याची माहिती दिली.सकाळी ११ वाजता ट्यून करा. संपूर्ण भारतातून प्रेरणादायी जीवन प्रवासांना उजाळा देणे ही नेहमीच आनंदाची बाब असते.


मन की बातचा १०३वा भाग ३० जुलैला प्रसारित झाला होता. त्या भागात पंतप्रधान मोदींनी मेरी माटी मेरा देश अभियानाची माहिती दिली होती. मन की बातच्या १०३व्या भागात बोलताना मोदींनी नैसर्गिक आपत्तीबद्दल सांगताना म्हटले की या संकटकाळात भारतातील सर्व देशवासियांनी सामूहिक प्रयत्नांची ताकद दाखवली आहे. स्थानिक लोक, एनडीआरएफचे जवान आणि स्थानिक प्रशासनामध्ये काम करणाऱ्या लोकांनी दिवस-रात्र संघर्ष करून अशा संकटांचा सामना केला आहे.






आजच्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐतिहासिक चांद्र मोहीम चांद्रयान ३च्या चंद्राच्या पृष्ठभागावरील यशस्वी लँडिंगबद्दल बोलणार आहेत. याआधी २३ ऑगस्टला चांद्रयान ३च्या लँडर मॉड्यूलने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे पाऊल ठेवले आहे.


मन की बात कार्यक्रम ३ ऑक्टोबर २०१४मध्ये सुरू झाला आहे ३० एप्रिल २०२३मध्ये या कार्यक्रमाने १०० भाग पूर्ण केले.

Comments
Add Comment

भारतासाठी आनंदाची बातमी ! चीन, पाकिस्तानची झोपच उडणार ; भारत आणि रशियामध्ये मोठा करार

Big deal between India and Russia : भारत आणि रशिया या दोन देशांतील मैत्रीपूर्ण संबंध संपूर्ण जगाला माहित आहे. जगाचा विरोध धुडकावत कधी

Heat Wave: पुढील तीन दिवस जरा जपूनच ! राज्यातील 'हे' शहर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत; नाशिकची स्थिती काय ?

Maharashtra Weather Update : राज्यभरात तपमानानं कहर केल्याचे चित्र आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या

West Bengal Election 2026 : विक्रमी मतदानामुळे ममता बॅनर्जींचे सरकार संपुष्टात येईल - अमित शाह

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्यातील राणाघाट येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Karnataka : पादचारी पूल कोसळला, आठ जखमी

मंगळुरू : कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री तालुक्यात एक अरुंद पादचारी पूल कोसळला. या

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये ठिकठिकाणी ईडीच्या धाडी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राजधानी कोलकात्यात

Indian History : सापडले दोन हजार वर्षे जुने तीन किलो वजनाचे प्राचीन ताम्रपत्र

बिलासपूर : छत्तीसगडच्या बिलासपूर येथील मल्हार परिसरातील रहिवासी संजीव पांडेय यांच्या ताब्यातून सुमारे २०००