Koyna Dam : कोयना धरणातील पाणीसाठा चिंताजनक!

सातारा : सध्या पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहे. सातारा जिल्ह्यात टंचाईची स्थिती गंभीर बनत चालली आहे. शिराळा तालुक्याचा अपवाद वगळता अन्यत्र पाऊस झालेला नाही. पेरण्या झालेल्या नाहीत. खरीप वाया गेला आहे. अशा परिस्थितीत कोयना धरणातील (Koyna Dam) पाणीसाठा अवघे ६८ टीएमसी आहे. या क्षेत्रात ७०० मिलिमीटर पावसाची अपेक्षा असली तरी धरण शंभर टक्के भरेल का, याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.


१५ ऑक्टोबरपर्यंत हा पाऊस अपेक्षित असून त्यानंतर धरण पाणीसाठ्याचे नियोजन केले जाईल. तोवर सिंचन, वीजनिर्मिती, पिण्याचे पाणी याबाबतच्या धोरणात कोणताही बदल केला जाणार नाही, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. या स्थितीत जिल्ह्याची संपूर्ण भिस्त ही सिंचन योजनांवरच आहे. त्यात कोयना धरणावर अवलंबून टेंभू, ताकारी, आरफळ योजना, तर चांदोली धरणावर अवलंबून म्हैसाळ योजना महत्त्वाची आहे. या योजना सध्या पूर्ण क्षमतेने चालवल्या जात आहेत. त्यासाठी पुरेसा पाणीसाठाही उपलब्ध करून देण्यात आला आहे.


कोयना धरणातून सिंचन योजनांसाठी ३८ टीएमसी पाणी उपलब्ध केले जाते. परंतु, आता पावसाळ्यात उपसलेले पाणी आणि धरणातील पाणीसाठा कमी होणे चिंताजनक आहे.


कोयना व्यवस्थापन तूर्त याकडे तटस्थपणे पाहत आहे. जी काही धोरणे आखायची, ती १५ ऑक्टोबरनंतर, असे निश्‍चित केले आहे. कोयना धरणक्षेत्रात आतापर्यंत ४३०० मिलिमीटर पाऊस झाला आहे. आणखी ७०० मिलिमीटर पावसाची अपेक्षा आहे.


तो किती पडतो, यावरच पुढील सगळे धोरण बदलणार आहे. धरण शंभर टक्के भरले तर शेती, उद्योग, पिण्यासाठीचे पाणी आणि वीजनिर्मिती यासाठीच्या कोट्यात काहीही बदल होणार नाही, मात्र धरण कमी भरले तर मात्र परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Leopard Conflict : 'गोळी' की 'नसबंदी'? बिबट्याला पकडण्यासाठी सरकारचा मास्टरस्ट्रोक! तब्बल 'इतक्या' कोटींचा खर्च करणार अन्...

जुन्नर : पुणे जिल्ह्याच्या जुन्नर (Junner) आणि उत्तर पुणे परिसरात बिबट्यांच्या (Leopard) संख्येत सातत्याने वाढ होत आहे,

Satbara Utara : ऐतिहासिक निर्णय! ६० लाख कुटुंबांना मोठा दिलासा; भूखंड विनाशुल्क नियमित करण्याचे राज्य सरकारचे निर्देश, ३ कोटी नागरिकांना थेट लाभ

मुंबई : राज्यातील नागरिकांसाठी एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. तुकडेबंदी

Nashik Malegaon Crime News : सूडापोटी 'सैतानी कृत्य'! ३ वर्षीय चिमुरडीचं लैंगिक शोषण करून डोकं दगडाने ठेचून...गांभीर्याने तपास सुरू

मालेगाव : नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील मालेगाव तालुका सध्या एका हादरवून टाकणाऱ्या आणि अमानुष घटनेने स्तब्ध झाला आहे.

Ahilyanagar News : बिबट्याच्या भीतीने शाळांच्या वेळेत तातडीने बदल! अहिल्यानगर-पुण्यातील तालुक्यांत पहिली ते चौथीसाठी वेगळी, तर माध्यमिकसाठी वेगळी वेळ जाहीर

अहिल्यानगर : अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यांतील काही तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे स्थानिक

कडाक्याच्या थंडीत पुणे पालिकेची शेकोटीवर बंदी! प्रदुषण नियंत्रणासाठी घेतला निर्णय

पुणे: राज्यभरात मागील आठवड्यांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे शरीराला ऊब मिळावी म्हणून अनेकजण शेकोटी

पुण्यात गुरुवारी पाणीबाणी, पाणी जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन

पुणे : पुणे शहरातील जलकेंद्रांच्या दुरुस्ती कामामुळे गुरुवार २० नोव्हेंबर रोजी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद