Koyna Dam : कोयना धरणातील पाणीसाठा चिंताजनक!

सातारा : सध्या पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहे. सातारा जिल्ह्यात टंचाईची स्थिती गंभीर बनत चालली आहे. शिराळा तालुक्याचा अपवाद वगळता अन्यत्र पाऊस झालेला नाही. पेरण्या झालेल्या नाहीत. खरीप वाया गेला आहे. अशा परिस्थितीत कोयना धरणातील (Koyna Dam) पाणीसाठा अवघे ६८ टीएमसी आहे. या क्षेत्रात ७०० मिलिमीटर पावसाची अपेक्षा असली तरी धरण शंभर टक्के भरेल का, याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.


१५ ऑक्टोबरपर्यंत हा पाऊस अपेक्षित असून त्यानंतर धरण पाणीसाठ्याचे नियोजन केले जाईल. तोवर सिंचन, वीजनिर्मिती, पिण्याचे पाणी याबाबतच्या धोरणात कोणताही बदल केला जाणार नाही, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. या स्थितीत जिल्ह्याची संपूर्ण भिस्त ही सिंचन योजनांवरच आहे. त्यात कोयना धरणावर अवलंबून टेंभू, ताकारी, आरफळ योजना, तर चांदोली धरणावर अवलंबून म्हैसाळ योजना महत्त्वाची आहे. या योजना सध्या पूर्ण क्षमतेने चालवल्या जात आहेत. त्यासाठी पुरेसा पाणीसाठाही उपलब्ध करून देण्यात आला आहे.


कोयना धरणातून सिंचन योजनांसाठी ३८ टीएमसी पाणी उपलब्ध केले जाते. परंतु, आता पावसाळ्यात उपसलेले पाणी आणि धरणातील पाणीसाठा कमी होणे चिंताजनक आहे.


कोयना व्यवस्थापन तूर्त याकडे तटस्थपणे पाहत आहे. जी काही धोरणे आखायची, ती १५ ऑक्टोबरनंतर, असे निश्‍चित केले आहे. कोयना धरणक्षेत्रात आतापर्यंत ४३०० मिलिमीटर पाऊस झाला आहे. आणखी ७०० मिलिमीटर पावसाची अपेक्षा आहे.


तो किती पडतो, यावरच पुढील सगळे धोरण बदलणार आहे. धरण शंभर टक्के भरले तर शेती, उद्योग, पिण्यासाठीचे पाणी आणि वीजनिर्मिती यासाठीच्या कोट्यात काहीही बदल होणार नाही, मात्र धरण कमी भरले तर मात्र परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Ashok Kharat Case: अशोक खरात महिलांना कसं भुलवायचा?; तपासात धक्कादायक माहिती समोर

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. अशोक खरात महिलांना टार्गेट करुन

मंत्री नितेश राणेंची विराट हिंदू संमेलनाला उपस्थिती; 'हिंदू एकतेची ऊर्जा आणि धर्माभिमान खरोखर प्रेरणादायी'

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे सकल हिंदू समाजाकडून विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले.

३० मार्च ते ४ एप्रिल दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचे नवीन सत्र

मुंबई: ३० मार्चपासून राज्यात आभाळी हवामान आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंक

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तिपत्र  मुंबई : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

Crime News : यवतमाळ हादरले! अर्धवट जळालेल्या 'त्या' तरुणीच्या मृतदेहाचं गूढ उकललं; पहिला गळा आवळला अन् मृतदेह जाळून....

यवतमाळ : जोडमोहा शिवारातील तासलोट जंगलात १५ दिवसांपूर्वी एका २६ वर्षीय तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह

Jyoti waghmare : ज्यांना पक्ष सांभाळता येत नाही, ते राज्य काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंनी 'साहेब' म्हटले, पण उद्धव ठाकरेंनी...; ज्योती वाघमारेंचा घणाघात

नांदेड : राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे सध्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी शिवसेना