India Japan Relationship : भारतात जपानची गुंतवणूक वाढणार, अनेकविध प्रकल्प येणार...

देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आगामी प्रोजेक्टस


मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा जपानमध्ये शासकीय अतिथी म्हणून सन्मान करण्यात आला. आजच ते आपल्या या दौऱ्यावरुन परतले आहेत. परतल्यानंतर मुंबई विमानतळावरच त्यांना पत्रकारांनी घेरलं. यावेळेस भारत- जपान संबंधांविषयी अनेक मुद्द्यांवर ते व्यक्त झाले.


देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जपान आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य करतंय. मला जपानच्या सरकारने राज्य अतिथी म्हणून त्या ठिकाणी निमंत्रित केलं होतं. मोठ्या प्रमाणात विविध सरकारी अधिकारी मंत्री असतील, पंतप्रधानांचे सल्लागार असतील, अशा सर्व लोकांसोबत बैठका झाल्या. जायकासारख्या ओरिये एजन्सी सोबत त्याच ठिकाणी बैठक झाली. आणि महत्त्वाचं की मुंबईमध्ये जी आपल्याला वर्सोवा ते विरार एक ४२ किलोमीटरची सिलिंग तयार करायची आहे, ज्यामुळे आपल्या एम एम आर रीजन मधलं पूर्ण वेस्टर्न सबर्ब आणि पश्चिमेचा भाग हा सर्व ट्राफिक मुक्त होणार आहे, त्याला संपूर्ण सहकार्य देण्याकरिता त्यांनी सकारात्मकता दाखवली आहे आणि त्यांनीही विनंती केली आहे की आपल्या केंद्र सरकारकडून हा प्रस्ताव आपण पाठवावा. त्याचप्रमाणे मुंबईतील मेट्रो लाईन ११, छत्रपती शिवाजी टर्मिनस टू वडाळा अंडरग्राउंड मेट्रो लाईन करण्याकरता त्यांनी अनुकूलता दाखवली आहे.


टोकियोमध्ये त्यांनी फ्लड मिटीगेशन प्रोजेक्ट राबवला आहे. त्यामध्ये साधारणपणे अंडरग्राउंड नेटवर्क तयार करून ज्यावेळी हाईटेड असतो आणि जोरात पाऊस असतो, पाणी फेकता येत नाही त्यावेळी पाणी खाली जमा करायचं असतं. त्यानंतर पाणी वापरायचं किंवा सोडायचं अशा प्रकारची व्यवस्था केलेली असते. हा प्रोजेक्ट आपण मुंबईकरता मागच्याच काळात त्यांच्याकडे दिला होता, आणि तो मंजूर करण्याकरता त्यांनी अनुकूलता दाखवली आहे.


देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, यासोबत काही गव्हर्नरशी भेट झाली व ते देखील त्यांचे ट्रेड डेलिगेशन्स घेऊन इथे यायला तयार आहेत. त्या संदर्भात आमच्या तारखा वगैरे ठरत आहेत. अनेक मोठ्या कंपन्यांशी चर्चा झाली. सोनी कंपनीने देखील या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्यासंदर्भात अनुकूलता दाखवली. मोठ्या प्रमाणात उद्योग आपल्या येथे येण्याकरिता आग्रही आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने आम्ही एक टीम तयार करत आहोत ज्यामध्ये उद्योग विभागाचे मेंबर तर असतील, पण जपानी भाषा बोलणारे देखील मेंबर असतील. सर्व प्रकारची गुंतवणूक आपल्याला महाराष्ट्रात आणता येईल.


जपानच्या विविध व्यवसायिकांशी ज्यावेळेस आम्ही चर्चा केली, त्यावेळी त्यांचं एकच म्हणणं होतं की, आम्ही सर्व इन्व्हेस्टमेंट ही चीनमध्ये केली पण आता आम्हाला ती इन्व्हेस्टमेंट चीनमध्ये सेफ वाटत नाही. त्यामुळे आता आम्हाला भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आम्हाला असं वाटतं की, भारतच असा देश आहे की ज्या ठिकाणी आमची इन्व्हेस्टमेंट सुरक्षित राहू शकते. आम्ही इतर देशांमध्येही गेलो पण ती क्षमता इतर देशांमध्ये नाही, असा विश्वास त्यांनी भारतावर दाखवला, असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर