Marathwada Rain : मराठवाड्यातील बळीराजाला पिकांना घालावे लागतेय तांब्याने पाणी...

पावसाने पाठ फिरवल्याने शेतकर्‍यांची दैन्यावस्था


मराठवाडा : पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीनंतर गेल्या महिन्याभरात मात्र पाऊस दडी मारुन बसला आहे. राज्यभरात पावसाच्या गैरहजेरीमुळे शेतकर्‍यांचे प्रचंड हाल होत आहेत. आधीच मान्सून उशिरा आला, त्यात जून महिना कोरडा गेला. जुलै महिन्यात थोडाफार पाऊस (Rain) झाल्याने किमान पेरण्या झाल्या. मात्र, आता पुन्हा ऑगस्ट महिना जवळपास कोरडा गेला आहे. त्यामुळे खरिपाचे पीक (Crop) संकटात सापडले आहे.


मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यांत पीक सुकून चालले आहे. पावसाअभावी शेतकरी अक्षरशः तांब्याने पाणी घेऊन पीकांच्या मुळांशी पाणी घालत आहेत. बळीराजाने प्रेमाने लावलेली त्याची रोपे सुकताना पाहून त्याचा जीव तीळतीळ तुटतोय पण पावसाने पाठ फिरवल्याने आता बळीराजाचं अख्खं कुटुंबच बादली, तांब्या हातात घेऊन रोजच्या वापरासाठीचं पाणी आपल्या बाळांना जगवण्यासाठी वापरत आहे. असंच चित्र औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील पाडळी गावातही पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीमुळे बळीराजा चिंतीत झाला आहे. आगामी काळात पाऊस न झाल्यास खरीप हंगाम हातून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


मागील तीन-चार वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकरी अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे संकटात सापडला आहे. दरम्यान, यंदा मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली. पण, ऑगस्ट महिना जवळपास कोरडा गेला असल्याने अनेक ठिकाणी २० दिवसांपेक्षा अधिकचा पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे पिकांना जगवण्यासाठी शेतकरी हाताने पिकांना थेंब-थेंब पाणी टाकत आहे. एकदा पाणी टाकल्यावर झाडाची किमान तीन चार दिवसांसाठी चिंता मिटते. परंतु यंदा पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीतील पाणी पातळी देखील घटली आहे. विहीरी आणि बोअरवेलचे पाणी आटले असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. आता पिण्यासाठी देखील अनेक ठिकाणी पाणी मिळत नसल्याने झाडांना टाकण्यासाठी तरी पाणी कोठून आणणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.



कोठे किती पाऊस पडला?



  • कोकण विभाग (२८ टक्के पाऊस) : सरासरी ७६६ मिलिमीटर पाऊस पडतो, प्रत्यक्षात २१७ मिलिमीटर पाऊस झाला.

  • नाशिक विभाग (२० टक्के पाऊस) : सरासरी १९७ मिलिमीटर पाऊस पडतो, प्रत्यक्षात ४० मिलिमीटर पाऊस झाला.

  • पुणे विभाग (२२ टक्के पाऊस) : सरासरी २४७ मिलिमीटर पाऊस पडतो, प्रत्यक्षात ५४ मिलिमीटर पाऊस झाला.

  • औरंगाबाद विभाग (२२ टक्के पाऊस) : सरासरी १९३ मिलिमीटर पाऊस पडतो, प्रत्यक्षात ४४ मिलिमीटर पाऊस झाला.

  • अमरावती (२९ टक्के पाऊस) : सरासरी २३१ मिलिमीटर पाऊस पडतो, प्रत्यक्षात ६८ मिलिमीटर पाऊस झाला.

  • नागपूर (५५ टक्के पाऊस) : सरासरी ३४७ मिलिमीटर पाऊस पडतो, १९३ प्रत्यक्षात मिलिमीटर पाऊस झाला.


Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Special Trains :नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; दिल्ली, मुंबई आणि चंदीगडवरून धावणार विशेष गाड्या

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ आणि २५

पुण्यात डिजिटल अरेस्टची धमकी देत, ज्येष्ठ नागरिकाची कोटींची फसवणूक

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाला कोट्यवधींचा

नाशिक महापौरपदासाठी राजकीय हालचालींना वेग; भाजपमधील तीन प्रभावी चेहरे चर्चेत

नाशिक : महानगरपालिका निवडणुकीनंतर नाशिकच्या सत्तावर्तुळात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. स्पष्ट संख्याबळासह

Amrit Bharat Express Train Routes : मुंबईकरांची चांदी! 'अमृत भारत एक्सप्रेस'ने लांब पल्ल्याचा प्रवास होणार स्वस्त; जाणून घ्या कुठे-कुठे थांबणार गाडी?

मुंबई : भारतीय रेल्वेने सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी सुरू केलेल्या 'अमृत भारत एक्सप्रेस' ताफ्यात आता आणखी ९

Ashish Jaiswal : आमदार आशिष जयस्वाल यांच्या पाठपुराव्याला यश; प्रकल्पबाधित तरुण दिनेश हावरे यांचा पोलीस सेवेतील मार्ग मोकळा!

सातारा : नियम आणि प्रशासकीय तांत्रिकतेच्या कचाट्यात अडकलेल्या एका होतकरू तरुणाच्या आयुष्यात अखेर आशेचा नवा

महापालिकेच्या अर्थसंकल्पाची औपचारिकता पूर्ण होणार

स्थायी समिती अध्यक्षांची निवड झाल्यानंतर आयुक्त मांडणार अर्थसंकल्प मुंबई : मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७चा