भाईंदर: मीरा रोडच्या शांतीनगर भागात राहणाऱ्या एका महिलेने आपल्या पतीची खलबत्ताच्या दगडाने डोक्यात प्रहार करून हत्या केल्याची घटना घडली आहे.
मीरा रोडच्या शांतीनगर सेक्टर ७ मधील ए -९ या आनंद सरिता सोसायटीत राहणारे आणि मुंबईच्या कपडा बाजार येथे काम करत असलेले रमेशकुमार गुप्ता त्यांची पत्नी राजकुमारी गुप्ता आणि त्यांचा मुलगा जतिन गुप्ता असे तीन जणांचे कुटुंब राहत होते.
गुरुवारी संध्याकाळी राजकुमारी (५५) हिने आपले पती रमेशकुमार (६९) यांच्या डोक्यात घरातील खलबत्ताच्या दगडाने प्रहार करून खून केला. काही दिवसांपासुन राजकुमारी यांचे मानसिक संतुलन बिघडले होते अशी माहिती मिळाली आहे. खुनाची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त जयंत बजबळे, नयानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे घटनास्थळी पोहचले असुन पाहणी तसेच अधिक तपास करीत आहेत.
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…
मुंबई: इमरान हाश्मीचा नवा चित्रपट 'ग्राउंड झिरो' सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर झाला.…
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…