Wagner group : खिचडी कशी चोरली यावर बैठकीत चर्चा करा!

जी अवस्था वॅगनर ग्रुपची झाली, तीच विरोधकांची होणार!


विरोधी पक्षाच्या नेत्यांना भाजप आमदार नितेश राणे यांचा टोला


मुंबई : भाजपविरोधात (BJP) विरोधी पक्षांनी (Opposition Parties) एकत्र येत आघाडी स्थापन केली तेव्हा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही आघाडी म्हणजे 'वॅगनर ग्रुप' (Wagner group) असल्याचे म्हटले होते. मात्र कालच मिळालेल्या वृत्तानुसार वॅगनर ग्रुपच्या प्रमुखांचं विमान क्रॅश झालं. याच गोष्टीचा आधार घेत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. जी वॅगनर ग्रुपची अवस्था झाली आहे तीच या विरोधकांचीही होईल, असा टोला त्यांनी यावेळेस लगावला.


नितेश राणे म्हणाले, आपल्याला आठवत असेल वॅगनर ग्रुपबद्दल तेव्हा संजय राऊतने फार बोंबोबोंब केली, अग्रलेख लिहिला की भारतातला विरोधी पक्ष हा वॅगनर ग्रुप आहे. पण काल मिळालेल्या माहितीनुसार वॅगनर ग्रुपच्या प्रमुखांचं विमान क्रॅश झालेलं आहे, मग आता हे सगळे विरोधी पक्ष ज्या एका विमानात बसले आहेत त्यांचं विमान देखील २०२४ ला क्रॅश होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. कितीही बैठका घ्या आणि कितीही त्या ग्रुपला 'I.N.D.I.A' म्हणा, जी वॅगनर ग्रुपची अवस्था झाली आहे तीच या विरोधकांचीही होईल, हे मी विश्वासाने सांगू शकतो, असं नितेश राणे म्हणाले.


मुंबईत होणार्‍या बैठकींबद्दल हा 'खिचडीचोर' मोठ्या बाता करतो की पत्रकार परिषद होणार, मोठमोठे नेते येणार. मग त्या मुंबईच्या बैठकीत तू आणि तुझ्या मालकाच्या मुलाने कामगारांची जी खिचडी चोरलेली आहे ती विरोधी पक्षांच्या सगळ्या नेत्यांना खायला घाला. तुम्हाला जमत नसेल तर आम्ही आमच्या वतीने या बैठकीसाठी खिचडीचे पॅकेट पाठवू. जेणेकरुन सगळे एकत्र बसा आणि खिचडी कशी चोरली यावर बैठकीत चर्चा करा आणि जे वॅगनर ग्रुपचं झालं तेच आपलं होणार यावर डोकं पकडून रडत बसा, अशा खोचक शब्दांत नितेश राणे यांनी टीका केली आहे.



संजय राऊतला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या योगदानाची जाण नाही


कोण आहेत हे बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) विचारणाऱ्या संजय राजाराम राऊत सारख्या खिचडी चोर, पत्रा चाळीतील मराठी लोकांची घरे लुटणारा चोर, कोविड सेंटर मध्ये भ्रष्टाचार करणार्‍या संजय राऊतला चंद्रशेखर बावनकुळे यांचे महाराष्ट्रासाठी, भाजपा साठी काय योगदान आहे याची ओळख असू शकत नाही, असंही नितेश राणे म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील

मुंबईत महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून केले अभिनंदन

राज्यभरातील २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीच अव्वल मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरलेल्या मुंबई

Raj Thackeray : भावाशी युती करूनही राज ठाकरेंच्या खात्यात २२ शून्य, मुंबईत 'मनसे'ला जबरदस्त धक्का; ठाकरे ब्रँड फेल!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी २० वर्षांचा वनवास संपवून एकत्र आलेल्या 'ठाकरे बंधूं'साठी आजचा निकाल

तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांचा प्रचंड मतांनी दणदणीत विजय

वार्ड ४७ मध्ये तरुणाईचा विजयघोष मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक ४७ मधून भारतीय जनता पक्षाचे

Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्रानं विकासालाच कौल दिला!" भाजपच्या मुसंडीनंतर बावनकुळेंनी मानले मतदारांचे आभार

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांचे कल स्पष्ट होऊ लागले असून, भाजपने महायुतीसह मुसंडी मारली