Board Exams : बोर्डाची वर्षातून दोनदा परीक्षा; नवा पॅटर्न सोपा की कठीण?

नवी दिल्ली : दहावी आणि बारावी या बोर्डाच्या परीक्षांना (Board Exams) शालेय व महाविद्यालयीन स्तरावर फार महत्त्व दिलं जातं. यात मिळालेल्या गुणांवर पुढील शैक्षणिक जीवन अवलंबून असतं. या बोर्ड परीक्षांसंदर्भात शिक्षण मंत्रालयाने (Education Ministry) मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना दोघांमधील सर्वोत्तम गुण निवडण्याची संधी उपलब्ध असणार आहे. यानुसार आता २०२४ च्या शैक्षणिक सत्रासाठी नवीन पाठ्यपुस्तके तयार केली जात आहेत.


महत्त्वाची बाब म्हणजे अकरावी आणि बारावीला विद्यार्थ्यांना कला, विज्ञान व वाणिज्य असं शाखानिहाय नव्हे तर त्यांच्या आवडीनुसार विषय निवडता येणार आहेत. शिवाय वर्षातून दोन वेळा घेण्यात येणार असणाऱ्या या परीक्षांमध्ये ज्या विषयांचा अभ्यास झालाय, फक्त त्याच विषयाची परीक्षा देण्याची मुभा विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच एकाच वेळी सर्व विषयांचीही परीक्षा दोन वेळा देता येणार आहे. निकालानंतर ज्या प्रयत्नामध्ये सर्वोत्तम गुण मिळाले असतील अशा गुणांचा विचार अंतिम निकालासाठी केला जाणार आहे.


अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यास करावा लागणार आहे. या दोन्ही भाषांपैकी एक भाषा ही भारतीय भाषा असणे अनिवार्य असणार आहे. आताच्या बोर्डाच्या पद्धतीनुसार, विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील भार कमी व्हावा यासाठी हा नवा पॅटर्न राबविण्यात येणार आहे. शिक्षणाच्या या नव्या धोरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आकलन आणि यशाचे मूल्यांकन करता येईल. त्यामुळे परीक्षा पद्धत आणखी सोपी झाली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Israel - Iran War : भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांची इराण-इस्रायली समकक्षांशी फोनवरून चर्चा

-परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा कतारच्या पंतप्रधानांशीही फोनवरुन संवाद - पश्चिम आशिया प्रदेशातील

Israel - Iran War : अली खामेनेई यांच्या मृत्युनंतर काश्मीरमधील लाल चौकात निदर्शने

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूबाबत तीव्र संताप

LPG Price: एलपीजी सिलिंडर महागले, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन किमती

मुंबई: देशातील सर्व तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत. गॅस सिलिंडरच्या किमती २८

Israel - Iran War : युद्धाचा हवाई वाहतुकीवर परिणाम; मुंबई विमानतळासह देशभरातील तब्बल ४४४ उड्डाणे रद्द

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण – इस्रायल संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Israel attacks Iran: बॉलिवूडची अभिनेत्री सोनल चौहान अडकली दुबईत; पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत

मुंबई: अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून इराणवर हल्ला केला असून मोठा युद्धाचा वणवा पेटला आहे. तिन्ही देशांमध्ये

Israel - Iran War : भारतीय बॅडमिंटनची सुवर्णकन्या अडकली दुबई विमानतळावर

भारतीय बॅडमिंटनची सुवर्णकन्या आणि दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू शनिवारी (२८ फेब्रुवारी)