नवी दिल्ली : परदेशात तुम्हाला कोणीतरी चांगली नोकरी मिळेल असे सांगून लाखो रूपये घेईल. त्यानंतर अशा जागी सोडतील ज्याठिकाणी गृहयुद्धासारखी परिस्थिती असेल. तेथील माफिया तुम्हाला कैदेत ठेवतील आणि खाण्यापिण्याशिवाय चांगले काम करून घेतील. त्यानंतर या माफियांच्या जाळ्यातून वाचल्यानंतर गैरपद्धतीने देशात घुसल्याप्रकरणी तुरुंगात कैद केले जाईल. या गोष्टींचा नुसता विचार करूनच अंगावर काटा येतो ना? मात्र हे असे १७ भारतीयांसोबत घडले आहे. हे भारतीय अनेक महिन्यांपर्यंत अशाच स्थितीत होते. दरम्यान, यांची सुटका करण्यात आली असून ते भारतात परतले आहे.
हे भारतीय मायदेशात परतल्यानंतर ट्युनिशियामध्ये भारतीय दूतावासने ट्विटरवर पोस्ट करत सांगितले की १७ भारतीयांपैकी अधिकाधिक पंजाब आणि हरयाणा येथील रहिवासी होते. त्यांना या वर्षी फेब्रुवारीमध्ये लीबियामध्ये कैद करून आणण्यात आणले होते. दरम्यान हे सर्व २० ऑगस्टला सुरक्षितरित्या भारतात परतले आहेत.
ट्रॅव्हल एजंटने त्यांच्या गरजेचा गैरफायदा उचलला. यांना चांगल्या नोकरीचे अमिष दाखवले त्यांच्याकडून पैसे घेतले आणि त्यांना लिबीयामध्ये सोडले. आम आदमी पक्षाचे राज्यसभा खादार विक्रमजीत सिंह यांच्या माहितीनुसार या लोकांकडून १३-१३ लाख रूपये घेण्यात आले आणि त्यांना इटलीमध्ये चांगली नोकरी देतो असे अमिष देण्यात आले. त्यासाठी यांना दुबईला नेण्यात आले. त्यानंतर इजिप्तला आणण्यात आले. त्यानंतर लीबिया देशात सोडण्यात आले.
काही लोकांनी त्यांच्या टीमशी संपर्क केला आणि सगळी गोष्ट सांगितली. त्यानंतर त्यांनी या भारतीयांना राहण्यासाठी हॉटेलमध्ये व्यवस्था केली.हॉटेलच्या कोणत्यातरी व्यक्तीने पोलीस आयुक्तांना ही माहिती दिली. तेथून यांची रवानगी जेलमध्ये झाली.
लीबियामध्ये भारतीय दूतावास बंद आहे. अशातच ट्युनिशियाच्या दूतावासाशी संपर्क करण्यात आला. २६ मेला ट्युनिशियामध्ये भारतीय दूतावासला याची माहिती दिली. सुटका झालेल्या लोकांनी सांगितले की त्यांना लीबियाच्या ज्वारा शहरामध्ये माफियांनी अपहरण केले होते. यानंतर १३ जूनला लीबियाच्या अधिकाऱ्यांनी भारतीयांची तेथून सुटका केली. मात्र त्यांना राजधानी त्रिपोलीच्या जेलमध्ये बंद केले. या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर गैरकायदा पद्धतीने लीबियामध्ये दाखल होण्याचा आरोप केला होता.
या १७ भारतीयांपैकी १२ लोक पंजाब आणि हरयाणा येथील आहेत. लीबियाचे अधिकारी या भारतीयांना सोडण्यास तयार नव्हते. त्यानंतर ट्युनिशियाचे राजदूत आणि भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दखल दिल्यानंतर लीबियाने त्यांना सोडण्याच नकार दिला.
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…
दिवसभरातील (Prahaar Bulletin) महत्वाच्या बातम्या… टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले…
राज्य मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय मुंबई : सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर आता…
प्रश्नपत्रिका तयार करतानाच घेणार 'ही' खास काळजी मुंबई : NEET PG परीक्षा रद्द झाल्यानंतर जवळपास…