Talathi Exam Timetable change : सर्व्हर डाऊनच्या गोंधळामुळे तलाठी परिक्षेच्या पुढील दोन्ही सत्रांमध्ये दीड तास उशीर

  155

विद्यार्थ्यांना भोगावा लागतोय नाहक त्रास


पुणे : आज महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये तलाठी भरती परीक्षा (Talathi Exam) पार पडते आहे. परंतु सकाळी पहिल्या सत्रापूर्वीच सर्व्हर डाऊन झाल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला होता. छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, नागपूर, लातूर या जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्रांवर सर्व्हर डाऊन (Server down) होते. सकाळी ९ ते ११ ही परिक्षेची वेळ दिलेली असताना साधारण पावणेदहाच्या सुमारास सर्व्हर्स पूर्ववत झाले. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला असून आता पुढील दोन्ही सत्रांच्या परिक्षाही दीड तास उशिरा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व परीक्षा केंद्रांबाहेर तसे बोर्ड लावण्यात आले आहेत.


अगोदर दिलेल्या वेळेप्रमाणे तलाठी परिक्षेचे पहिले सत्र सकाळी ९ ते ११, दुसरे सत्र १२:३० ते २:३० तर तिसरे सत्र ४ ते ६ या वेळेत पार पडणार होते. मात्र सर्व्हर डाऊनच्या गोंधळामुळे आता प्रत्येक सत्र दीड तास पुढे ढकलण्यात आले आहे. यानुसार दुसरे सत्र दुपारी २ ते ४ या वेळेत होईल तर तिसरे सत्र ५:३० ते ७:३० या वेळेत होणार आहे. पहिल्या सत्रासाठी ज्या वेळेस प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरु करण्यात आली त्यानुसार पुढील दोन तासांचा पूर्ण वेळ दिला जाणार आहे.


परीक्षा आता जरी व्यवस्थित सुरु असली तरी यात विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत. काही विद्यार्थी केवळ परिक्षेकरता दुसर्‍या जिल्ह्यातून आले आहेत व त्यांनी परतीचे तिकीटही बुक केले आहे. आता तब्बल दीड तास उशीर होणार असल्याने या विद्यार्थ्यांच्या रेल्वे हमखास चुकणार आहेत. विद्यार्थ्यांची काहीही चूक नसताना त्यांना या सगळ्या प्रकाराला सामोरे जावे लागत असल्याने त्यांच्यासोबत आलेले नातेवाईकही संतप्त झाले आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची