छत्रपती संभाजीनगर : आज महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये तलाठी भरती परीक्षा पार पडते आहे. परंतु सर्व्हर डाऊन असल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला आहे. छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, नागपूर या जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्रांवर सर्व्हर डाऊन आहेत. त्यामुळे नोंदणीप्रक्रिया देखील पू्र्ण झालेली नाही. सकाळी ९ ते ११ ही परिक्षेची वेळ आहे मात्र सर्व्हरच्या कारणाने परीक्षा सुरु होऊ शकत नाही आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून ते अजूनही परीक्षा केंद्राबाहेर खोळंबले आहेत.
विद्यार्थ्यांच्या मनात यामुळे अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. परिक्षेची वेळ वाढवून मिळणार का? आता परीक्षा घेतली जाणार का? काही विद्यार्थी तर पुण्याहून छत्रपती संभाजीनगरच्या केंद्रावर आले आहेत. तर परीक्षा फी भरल्यामुळे व आता ही अशी समस्या उद्भवल्यामुळे काही विद्यार्थी संतप्त झाले आहेत. विद्यार्थ्यांकडून मिळणार्या प्रतिक्रियेनुसार अधिकार्यांकडून कोणतीही माहिती पुरवण्यात आलेली नाही, विद्यार्थी केवळ परीक्षा सुरु होण्याची वाट बघत केंद्रांबाहेर थांबले आहेत.
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला हरवले…
नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…
घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…
या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…
नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…
मुंबई : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात…