Nashik Crime : नाशिकच्या चोरट्यांची हिंमत वाढली; थेट केंद्रीय मंत्र्याच्या आईचे मंगळसूत्र चोरले!

काय घडलं नेमकं?


नाशिक : नाशिक (Nashik) शहरातील गुन्हेगारी वाढीस लागली असून नाशिकमधून पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकच्या आरटीओ (RTO) परिसरात दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी चक्क केंद्रीय मंत्री भारती पवार (Bharati Pawar) यांच्या आईच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविल्याची घटना समोर आली आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नाशिक शहरात सामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या मातोश्री शांताबाई बागुल या सायंकाळी सहा ते सात वाजेच्या सुमारास भाजीपाला घेण्यासाठी परिसरात असलेल्याच भाजी मार्केटमध्ये जात होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातली दोन ते अडीच तोळ्यांची सोन्याची पोत हिसकावली. यावेळी परिसरामध्ये जास्त वर्दळ नसल्यामुळे कोणाला आवाज देता आला नाही असे शांताबाई बागुल यांनी सांगितलं.



भारती पवार यांच्या मातोश्री काय म्हणाल्या?


नाशिकच्या आरटीओ ऑफिस परिसरातील दुर्गा नगर येथे घडलेल्या या प्रकाराबद्दल भारती पवार यांच्या मातोश्रींनी स्वतः माहिती दिली. त्यांनी माझ्या गळ्यात हात टाकला. पोत हिसकावून घेतली. पोत गेल्याचं मला कळलं. ते हळूहळू निघून गेले. पण त्यावेळी तिथे कोणी माणसेच नव्हती. ते पुढे जाऊन वळले आणि बघत होते मी काही ओरडते का ते. पण मला काहीच सुचेनासे झाले. दोघेही स्कूटीवर आले होते, अशी माहिती भारती पवार यांच्या आईंनी दिली.



नाशिकमधील गुन्हेगारी चिंताजनक


नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी पोलिसांसह नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. सातत्याने घटनांनी नाशिक शहर हादरत असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाशिक गुन्हेगारीबाबत काही दिवसांपूर्वी चिंता व्यक्त केली होती. सामान्य नागरिक तर अशा घटनांमुळे दहशतीखाली आहेत. मात्र आता थेट केंद्रीय मंत्र्यांच्या आईचं मंगळसूत्र चोरट्यांने पळवल्याने नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Bacchu Kadu Farmers Andolan : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बच्चू कडू आज मुंबईत; संध्याकाळी ७ वाजता थेट मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा!

७ वाजता महाबैठक! मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार मुंबई : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून

Weather Updates : समुद्र खवळणार, प्रशासनाची मोठी खबरदारी! हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा मोठा निर्णय

अरबी समुद्र (Arabian Sea) आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) झालेल्या हवामान बदलांमुळे (Weather Changes) महाराष्ट्राच्या

प्रतीक्षा संपली! नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नेरळ-माथेरान मिनी ट्रेन धावणार!

नेरळ : मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ-माथेरान दरम्यानची बहुप्रतिक्षित मिनी ट्रेन सेव

‘आंदोलन कायम ठेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार’- बच्चू कडू

मुंबईला जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार नागपूर : कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातल्या आरोपीने लपवलेल्या मोबाईलमध्ये मिळाला मृत्यूपूर्वीचा 'तो' फोटो...

फलटण: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा झाला आहे. आत्महत्या

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हिव्हिपॅट नाहीच; काय दिलं निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत कायद्यांत तरतूद नाही मुंबई : स्थानिक