Nashik Crime : नाशिकच्या चोरट्यांची हिंमत वाढली; थेट केंद्रीय मंत्र्याच्या आईचे मंगळसूत्र चोरले!

  228

काय घडलं नेमकं?


नाशिक : नाशिक (Nashik) शहरातील गुन्हेगारी वाढीस लागली असून नाशिकमधून पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकच्या आरटीओ (RTO) परिसरात दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी चक्क केंद्रीय मंत्री भारती पवार (Bharati Pawar) यांच्या आईच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविल्याची घटना समोर आली आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नाशिक शहरात सामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या मातोश्री शांताबाई बागुल या सायंकाळी सहा ते सात वाजेच्या सुमारास भाजीपाला घेण्यासाठी परिसरात असलेल्याच भाजी मार्केटमध्ये जात होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातली दोन ते अडीच तोळ्यांची सोन्याची पोत हिसकावली. यावेळी परिसरामध्ये जास्त वर्दळ नसल्यामुळे कोणाला आवाज देता आला नाही असे शांताबाई बागुल यांनी सांगितलं.



भारती पवार यांच्या मातोश्री काय म्हणाल्या?


नाशिकच्या आरटीओ ऑफिस परिसरातील दुर्गा नगर येथे घडलेल्या या प्रकाराबद्दल भारती पवार यांच्या मातोश्रींनी स्वतः माहिती दिली. त्यांनी माझ्या गळ्यात हात टाकला. पोत हिसकावून घेतली. पोत गेल्याचं मला कळलं. ते हळूहळू निघून गेले. पण त्यावेळी तिथे कोणी माणसेच नव्हती. ते पुढे जाऊन वळले आणि बघत होते मी काही ओरडते का ते. पण मला काहीच सुचेनासे झाले. दोघेही स्कूटीवर आले होते, अशी माहिती भारती पवार यांच्या आईंनी दिली.



नाशिकमधील गुन्हेगारी चिंताजनक


नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी पोलिसांसह नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. सातत्याने घटनांनी नाशिक शहर हादरत असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाशिक गुन्हेगारीबाबत काही दिवसांपूर्वी चिंता व्यक्त केली होती. सामान्य नागरिक तर अशा घटनांमुळे दहशतीखाली आहेत. मात्र आता थेट केंद्रीय मंत्र्यांच्या आईचं मंगळसूत्र चोरट्यांने पळवल्याने नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित

प्रसाद ओक यांना निळू फुले कृतज्ञता सन्मान जाहीर

पुणे : निळू फुले यांचे कुटुंबीय व बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा निळू फुले