काँग्रेसचा बाळासाहेब थोरात यांना मोठा झटका

  179

मुंबई: काँग्रेसच्या (congress) नव्या वर्किंग कमिटीची (congress working committee) घोषणा करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील ८ नेत्यांना सामील केले आहे. मात्र गेल्या समितीमध्ये सामील असलेले वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना या कमिटीमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. सोबतच नव्या वर्किंग कमिटीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचाही समावेश नाही.


गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी प्रचारासाठी सरळ संगमनेर येथे आले होते. त्या वेळेस वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक नेते काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले होते. यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचे चित्र समोर आले होते. अशातच थोरात मात्र निष्ठेने पक्षाशी एकनिष्ठ राहिले. याशिवाय थोरात यांनी गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय मानले जाते. त्यावेळेस राहुल गांधी संगमनेर येथे थांबले होते. तेव्हा ते म्हणाले होते की थोरात यांना मोठी संधी मिळेल. पुढेही तसेच घडले.



उद्धव सरकार बनवण्यात थोरातांची महत्त्वाची भूमिका


बाळासाहेब थोरात यांना पक्षाच्या राष्ट्रीय समितीमध्ये आणण्यात आले. यातच अनेक घटनाक्रम बदलले. महाविकास आघाडीचे सरकार बनले. यात थोरात यांनी मुख्य भूमिका निभावली होती. त्यानंतर ते सरकार कोसळले. यादरम्यान थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांचे वडील सुधीर तांबे यांना पक्षाने उमेदवार केले. मात्र त्यांनी वेळेवर आपली उमेदवारी दाखल केली नाही.



नाना पटोले आणि थोरात यांच्यात वाद


चर्चा होती की थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे भाजपसोबत जातील. थोरात त्यावेळेस रुग्णालयात होते. दरम्यान, सत्यजीत सरळपणे भाजपमध्ये सामील झाले नाहीत मात्र त्यांनी भाजपच्या समर्थनाने विजय मिळवला. पक्षाने तांबेंविरोधात कारवाई केली. थोरात यांना या प्रकरणी टीका आणि चौकशीचा सामना करावा लागला. त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि थोरात यांच्यात वाद झाला होता.



सत्यजीत तांबेंनी वाढवल्या अडचणी


यातच विजयानंतरही तांबे यांनी पुन्हा पक्षात येण्यास नकार दिला. याउलट त्यांचे भाजपशी संबंध वाढले. असेही मानले जाते की थोरात तांबे यांच्या राजकीय रणनीतीने प्रभावित झाले होते. त्याचमुळे त्यांना यावेळेस वर्किंग कमिटीमध्ये स्थान मिळाले नाही.

Comments
Add Comment

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड

महा मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक विक्रम; ३९ महिन्यांत ओलांडला २० कोटी प्रवाशांचा टप्पा!

मुंबई : मुंबईच्या मेट्रोने आज खराखुरा इतिहास रचला आहे. अवघ्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत