Tadoba Andhari wildlife sanctuary : ताडोबाच्या नावलौकिकाला गालबोट! तब्बल १२ कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक

सफारी बुकिंग करणार्‍या एजन्सीविरोधात गुन्हा दाखल... नेमके प्रकरण काय?


चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील अतिशय प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासंदर्भात (Tadoba Andhari wildlife sanctuary) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या व्याघ्र प्रकल्पाला सफारी बुकिंग करणार्‍या एजन्सीने सुमारे १२ कोटी १५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्यूशन (Wild connectivity Solutions) या सफारी बुकिंग करणार्‍या एजन्सीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


करारनाम्यानुसार तीन वर्षांमध्ये एकूण २२,८०,६७,००० देय रकमेपैकी केवळ १०,६५,००,००० रकमेचा भरणा या एजन्सीने केला आहे. तर उर्वरित १२ कोटी १५ लाख रुपयांसाठी वारंवार पाठपुरावा करुनही उपयोग झाला नाही. त्यामुळे एजन्सीचे संचालक अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभागीय वनाधिकारी सचिन शिंदे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.



नेमके प्रकरण काय?


'वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्यूशन्स' या कंपनीकडे गेल्या तीन वर्षांपासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी बुकिंगचे सर्व हक्क देण्यात आले होते. या कंपनीने बुकिंगमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करुन, अनेक प्रकारचे गैरव्यवहार करुन या प्रकल्पात चुकीच्या पद्धतीने बुकींग्ज केले, अशी शंका ताडोबाच्या अधिकार्‍यांना होती. त्यामुळे जुलै महिन्यापासून या कंपनीसोबतचं कंत्राट संपवण्यात आलं होतं.


मात्र त्यानंतर कंपनीबद्दलच्या गैरव्यवहारांची शंका अधिक बळावत गेली. ताडोबाच्या इतिहासात पहिल्यांदाच जिप्सी चालक आणि गाइड्स यांचाही दीड ते दोन महिने उलटून गेले तरीही पगार झाला नाही. यासंबंधी ताडोबाच्या समितीने एफआयआर दाखल केल्यानंतर आता कंपनीकडून फसवणूक करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. जवळजवळ १२ कोटी १५ लाख रुपये या कंपनीकडे थकीत आहेत.



ताडोबाच्या नावलौकिकाला गालबोट


ताडोबा हा जगभरातील एक प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प आहे. हजारो लोक विश्वासाने ताडोबाच्या वेबसाईटला भेट देत असतात. अशा प्रकल्पाची तब्बल १२ कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक होणं, ही गोष्ट ताडोबाच्या नावलौकिकाला गालबोट लावणारी आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Comments
Add Comment

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई

शेतकऱ्यांसाठी मंत्री महाजनांचा मोठा निर्णय, सुपूर्द केला वर्षभराचा ‘पगार’

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी मंत्री गिरीश महाजन यांनी

अमरावती महानगरपालिकेला ई-बस डेपो-व चार्जींग सुविधेसाठी बडनेरा येथील जमीन

अमरावती : अमरावती महापालिकेला केंद्र शासन पुरस्कृत पी.एम.ई बस योजनेतून मिळालेल्या ई-बस डेपो व चार्जींग

दिवाळीच्या सुट्टीत फिरण्याचे नियोजन करताय ? 'या' चार जागांना नक्की भेट द्या

मुंबई : पावसाळ्यातली हिरवळ अनुभवल्यानंतर आता गुलाबी थंडीची चाहुल सर्वांना लागली आहे. त्यामुळे छान थंड हवेच्या

अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडून तब्बल ३१,६२८ कोटींची मदत; २५३ तालुक्यांना सरसकट मदत देणार

'खरडून गेलेल्या जमिनीला' मिळणार हेक्टरी ३.४७ लाखांची मदत; शेतकरी, घरे आणि जनावरांसाठी भरीव निधी मुंबई: