Black marketing of Rice : तांदळाचा काळाबाजार! वर्धा जिल्ह्यातील ८८ हजार किलो तांदूळ जप्त

  207

साठेबाजांचे चांगलेच धाबे दणाणले


वर्धा : वर्धा (Wardha) जिल्ह्यातील पुलगाव येथे तांदळाच्या गोदामावर छापा टाकत पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ८८ हजार किलो तांदूळ जप्त करण्यात आला आहे. या गोदामामध्ये अनेक दिवसांपासून तांदळाचा काळाबाजार (Black marketing of Rice) सुरु असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार छापा टाकत हा तांदूळ जप्त करण्यात आला आहे.


विशेष बाब म्हणजे वर्ध्यातील शासकीय तांदूळ छत्तीसगडला रवाना होत होता. स्वस्त धान्य दुकानातून तांदूळ खरेदी करुन तो छत्तीसगडच्या राईस मिलमध्ये पाठवला जायचा, ही बाब तपासातून समोर आली आहे. या प्रकरणी तांदळाची वाहतूक करणार्‍या तीन ट्रकचालकांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्यावर जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.


वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील महेश शामलाल अग्रवाल या व्यापार्‍याचं हे गोदाम होतं. वर्धा पोलिसांच्या कारवाईनंतर शासकीय तांदळाचा काळाबाजार करणार्‍या साठेबाजांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Vande Bharat Express: मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस १६ जूनपासून आठवड्यातून तीनच दिवस

रत्नागिरी: भारतीय रेल्वेने मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या (22229/22230) २०२५ च्या मान्सून कालावधीसाठी

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट विशेष ट्रेनचा 9 जूनला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट अंतर्गत भारत गौरव ट्रेनला मुंबईत हिरवा झेंडा  मुंबई: महाराष्ट्र शासन आणि भारतीय

विठ्ठल-रुक्मिणीचे २७ जूनपासून मिळणार २४ तास दर्शन

सोलापूर : आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. या आषाढी

Wild Vegetables: पावसामुळे यंदा रानभाज्यांचे लवकर आगमन, ग्राहकांची मागणी

जिल्ह्यातील अनेक बाजारात रानभाज्या विक्रीसाठी येण्यास सुरुवात  दिंडोरी:  सुरगाणा, पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर,

पुणे महापालिकेचे मिशन मूषक विनाश! नाट्यगृह, प्रेक्षागृह आदी ठिकाणी पेस्ट कंट्राेल

महापालिकेच्या सर्वच नाट्यगृहांत ‘पेस्ट कंट्राेल’ पुणे: यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उंदराच्या उच्छादानंतर

99th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान यावर्षी साताऱ्याला!

तब्बल ३२ वर्षानंतर भरवले जाणार चौथे संमेलन पुणे:  यंदाचे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (99th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan)