कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीची तरूणाने केली हत्या

  192

मुंबई: कल्याणमध्ये (kalyan) एका तरूणाने अल्पवयीन मुलीची (minor girl) भर रस्त्यात चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. या जीवघेण्या हल्ल्यात त्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला. ही मुलगी ११ वर्षांची होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आदित्य कांबळे(वय २५) याला अटक केली आहे.



अशी घडली घटना


कल्याणच्या तिसगावमध्ये ही घटना घडली. ही अल्पवयीन मुलगी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आपल्या आईसह घरी जात होती. याच वेळीस सोसायटीच्या परिसरातच या तरूणाने या अल्पवयीन मुलीवर चाकूने सपासप वार केले. त्याचवेळेस तेथील परिसरातील नागरिकांनी ही घटना पाहिली आणि तातडीने तिथे धाव घेत या तरूणाला अडवले.



आरोपी ताब्यात


मात्र त्याआधी या तरूणाने मुलीवर जोरदार वार केले होते. पोलिसांनी या आरोपीला चांगलाच चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. दुसरीकडे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या या मुलीला उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच तिचा वाटेतच मृत्यू झाला. आईसमोर या मुलीवर असा जीवघेणा हल्ला झाल्याने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.


दरम्यान, या तरूणाने अल्पवयीन मुलीवर का हल्ला केला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Devendra Fadanvis : कोंचिग क्लासमधील लैंगिक छळाप्रकरणी SIT स्थापन करणार; नराधमांना कठोर शिक्षा देणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक

Pratap Sarnaik: आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था

एसटी कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था स्वखर्चाने करणार - प्रताप सरनाईक  मुंबई: आषाढी एकादशी निमित्त श्री.

Monsoon Update : विदर्भात मान्सून निराशाजनक; नागपूरसह पाच जिल्हे रेड झोनमध्ये? शेतकरी चिंताग्रस्त!

नागपूर : विदर्भात यंदा मान्सूनचे अपेक्षेपेक्षा पंधरा दिवस लवकर आगमन झाल्यानंतर शेतकरी व सामान्य जनतेला

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी

वारीतलं रिंगण : चैतन्य फुलवणारा सोहळा!

इंदापूर : आषाढी वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नाही, ती आहे विश्वासाची, भक्तीची आणि नित्य उत्साहाची