Shasan Aplya dari : अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी, महिला व कलावंतांसाठीही सरकार कटीबद्ध

'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात अजितदादांचे वक्तव्य


शिर्डीत मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री साईबाबांचे घेणार दर्शन


शिर्डी : आज अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील काकडी गावात 'शासन आपल्या दारी' (Shasan Aplya Dari) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना अजितदादांनी मुख्यमंत्र्यांचे भरभरुन कौतुक केले. तसंच 'शासन आपल्या दारी' या उपक्रमामुळे झालेला फायदा सांगितला.

अजित पवार म्हणाले, देशामध्ये अनेक राज्य सरकार असतात जे आपापल्या पद्धतीने सरकार चालवतात, राज्यकर्ते मंत्रालयात बसून निर्णयदेखील घेतात. परंतु ज्या योजना सर्वसामान्य, अगदी शेवटच्या माणसाकरता असतात दुर्दैवाने त्या योजनेचा लाभ त्या माणसापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणूनच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आणि 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम सुरु करुन वेगवेगळ्या गटातील लाभार्थ्यांना हुडकून स्वतः त्यांच्यापर्यंत पोहोचायचे ठरवले.

पुढे ते म्हणाले, आम्ही महिला व वयस्कर कलावंतांनाही लाभ दिला. शेवटी कुठलाही कलावंत असला तरी त्याच्या अंगात कला असतेच, पण प्रत्येकाचा एक काळ असतो. उतारवयात त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं आणि कधीकधी दोन वेळचं अन्नदेखील या कलावंतांना मिळत नाही. त्याहीकरता शासन कटीबद्ध आहे, जागरुक आहे. आज करोडो रुपयांचा खर्च आपण त्यांच्यासाठी करत आहोत. असं अजित पवार म्हणाले.

साईबाबांचे घेणार दर्शन


साईबाबांच्या शिर्डीत 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम होणं हा एक उत्तम योगोयोग आहे. साईबाबांनी दिलेला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश आपण सर्वांनी कायम पाळला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले. कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री साईबाबांचे दर्शन घेऊन मग मुंबईला रवाना होणार आहेत.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा