Shasan Aplya dari : अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी, महिला व कलावंतांसाठीही सरकार कटीबद्ध

  193

'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात अजितदादांचे वक्तव्य


शिर्डीत मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री साईबाबांचे घेणार दर्शन


शिर्डी : आज अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील काकडी गावात 'शासन आपल्या दारी' (Shasan Aplya Dari) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना अजितदादांनी मुख्यमंत्र्यांचे भरभरुन कौतुक केले. तसंच 'शासन आपल्या दारी' या उपक्रमामुळे झालेला फायदा सांगितला.

अजित पवार म्हणाले, देशामध्ये अनेक राज्य सरकार असतात जे आपापल्या पद्धतीने सरकार चालवतात, राज्यकर्ते मंत्रालयात बसून निर्णयदेखील घेतात. परंतु ज्या योजना सर्वसामान्य, अगदी शेवटच्या माणसाकरता असतात दुर्दैवाने त्या योजनेचा लाभ त्या माणसापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणूनच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आणि 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम सुरु करुन वेगवेगळ्या गटातील लाभार्थ्यांना हुडकून स्वतः त्यांच्यापर्यंत पोहोचायचे ठरवले.

पुढे ते म्हणाले, आम्ही महिला व वयस्कर कलावंतांनाही लाभ दिला. शेवटी कुठलाही कलावंत असला तरी त्याच्या अंगात कला असतेच, पण प्रत्येकाचा एक काळ असतो. उतारवयात त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं आणि कधीकधी दोन वेळचं अन्नदेखील या कलावंतांना मिळत नाही. त्याहीकरता शासन कटीबद्ध आहे, जागरुक आहे. आज करोडो रुपयांचा खर्च आपण त्यांच्यासाठी करत आहोत. असं अजित पवार म्हणाले.

साईबाबांचे घेणार दर्शन


साईबाबांच्या शिर्डीत 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम होणं हा एक उत्तम योगोयोग आहे. साईबाबांनी दिलेला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश आपण सर्वांनी कायम पाळला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले. कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री साईबाबांचे दर्शन घेऊन मग मुंबईला रवाना होणार आहेत.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत