BJP: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची जोरदार तयारी

  105

नवी दिल्ली: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी(assembly election) विविध पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपही (bjp) पाच राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत कोणतीच कसर सोडणार नाही आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय निवडणूक समितीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पक्ष अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि अमित शाह यांच्यासह सीईसी उपस्थित होते. तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंहही बैठकीत सामील होते.



आधीपासूनच तयार आहे भाजप


भाजपची केंद्रीय निवडणूक समिती ही निवडणुकीची रणनीती आणि निर्णय घेणारी पक्षाची सर्वात मोठी कमिटी आहे. साधारणपणे ही समितीची बैठक निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्यानंतर होते मात्र यावेळी भाजप सुरूवातीपासूनच जोरदार तयारी करत आहे. कारण राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आहे त्यामुळे पक्ष यावेळेस तयारीमध्ये कोणतीच कमतरता सोडणार नाही.



INDIA विरुद्ध NDAची लढाई


कर्नाटकमध्ये भाजपला मात दिल्यानंतर काँग्रेस राष्ट्रीय स्तरावर मजबूत दिसली आणि विरोधी पक्षांच्या आघाडीमध्ये त्यांचे महत्त्व वाढले. यानंतर विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली. ही आघाडी २०२४च्या निवडणुकीत भाजपला टक्कर देईल.



या पाच राज्यांत या वर्षी होणार निवडणूक


या वर्षी छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान आणि मिझोरमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. असे मानले जात आहे की छत्तीसगड आणि मध्य प्रदेश यांच्याव्यतिरिक्त इतर राज्यांच्या निवडणूक मुद्द्यावर भाजपची समिती इतर बैठका घेऊ शकते.

Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके