Ajay Rai: मोदींविरोधात निवडणूक लढवणारे अजय राय यूपी काँग्रेसचे नवे अध्यक्ष

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीआधी (loksabha election) उत्तर प्रदेशात (uttar pradesh) आता काँग्रेस (congress) अॅक्टिव्ह दिसत आहे. काँग्रेसचे माजी आमदार अजय राय(ajay rai) उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या(up congress committee) अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. काँग्रेस नेते अजय राय यांनी दोनदा पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीमधून लोकसभेची निवडणूक लढवली आहे. पहिल्यांदा २०१४ आणि त्यानंतर २०१९ मध्ये यांनी निवडणूक लढवली होती.


अजय रायने यूपी काँग्रेसमध्ये बृजलाल खाबरी यांची जागा घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ८० जागा असलेला उत्तर प्रदेश देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मात्र सातत्याने निवडणूक हरणाऱ्या काँग्रेसची स्थिती या ठिकाणी खूप खराब आहे. २०१९मधील निवडणुकीमध्ये काँग्रेसने आपली परंपरागत आणि सगळ्यात सुरक्षित मानली जाणारी अमेठीची जागाही गमावली होती. अशातच विखुरलेल्या संघटनेला एकत्र करणे आणि लोकसभा निवडणुकीआधी पार्टी कॅडर तयार करणे हे अजय राय यांच्याशी आव्हान असणार आहे.


२०१९च्या लोकसभा निवडणुकीत यूपीमध्ये काँग्रेसला केवळ रायबरेली या जागेवर विजय मिळाला होता. सोनिया गांधी येथे खासदार आहेत. २०२२च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ दोनच जागा मिळाल्या होत्या.



कोण आहेत अजय राय


१९ ऑक्टोबर १९६९ला वाराणसीत जन्मलेले अजय राय पाच वेळा आमदार राहिले आहेत. १९९६मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते २००७मपर्यंत आमदार राहिले. यानंतर भाजमपधील मतभेदानंतर त्यांनी समाजवादी पक्ष जॉईन केला होता. २००९मध्ये त्यांनी मुरली मनोहर जोशी यांच्याविरोधात निवडणूक लढवली आणि ते हरले होते. त्यानतंर त्यांनी काँग्रेस पक्षाचा हात धरला. अजय राय यांच्याबाबत असे बोलले जाते की ते आपल्या जोरावर निवडणूक जिंकतात आणि पक्षाला याचा फायदा होतो. मात्र गेल्या काही निवडणुकीत त्यांना सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला.

Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी