Pune murder: पुण्यात हत्येचा थरार, चित्रपट पाहून येणाऱ्या तरूणाचा घेतला जीव

  178

मुंबई: पुण्यात (pune) अंगाचा थरकाप उडवणारी अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात दहा ते बारा जणांच्या टोळीने एका तरूणाची बेदरकारपणे हत्या (murder) केल्याची भयानक घटना घडली आहे. ही घटना १५ ऑगस्टच्या रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली.


मिळालेल्या माहितीनुसार ही हत्या पूर्ववैमनस्यातून घडली. आठ ते दहा जणांच्या टोळीने तलवारी, लोखंडी हत्यार तसेच दगडाने मारहाण करून हत्या केल्याची घटना घडली. पुण्यातील मंगला टॉकीजसमोर हा प्रकार घडला. याप्रकरणी ९ जणांवर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नितीन म्हस्के असे हत्या करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. हत्या केल्यानंतर सर्व आरोपी तेथून पळून गेले. दरम्यान, पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. या प्रकरणात आरोपी सागर कोळनट्टी उर्फ यल्ला, पंडित कांबळे, मलिक कोळ्या उर्फ तुंड्या, इम्रान शेख तसेच आणखी पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नितीन म्हस्के मंगला टॉकीजमध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. रात्रीचा 'गदर २' या सिनेमाचा शो पाहून तो आपल्या घरी परतत होता. मात्र त्याचवेळी आरोपी त्याला मारण्यासाठी दबा धरून बसले होते. तो थिएटरमध्ये सिनेमा पाहून परतत असताना या आरोपींच्या टोळीने त्याच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्याला हत्यांरांनी प्रचंड मारहाण केली.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुळावर याल, तर खबरदार!

मनसेविरोधात संतप्त वृत्तपत्र विक्रेत्यांची ठाणे स्थानकाबाहेर निदर्शने ठाणे : मुंब्रा रेल्वे दुर्घटनेच्या

मान्सून पुन्हा सक्रीय होण्याची चिन्हे

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारली आहे. खरीप हंगामाची तयारी केलेली असतानाच अचानक पावसाने

आषाढी यात्रेसाठी एसटीकडून ५,२०० विशेष बसचे नियोजन

पंढरपूर :आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रित लढवणार - मुख्यमंत्री

विदर्भाचा बॅकलॉग 2027 पर्यंत संपणार अकोला : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रित लढवणार

मस्तच...! चालकाला झोप आली तर लगेच अलार्म वाजणार, एसटीत आता AI तंत्रज्ञानाच्या स्मार्ट ई-बसेस

पुण्यात स्मार्ट ई-बसेसचे सादरीकरण पुणे: एसटी महामंडळाच्या ताफ्यात आता एआय तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक

Vande Bharat : कोल्हापूरकरांनो तुमच्यासाठी खुशखबर! कोल्हापूर-मुंबई दरम्यान १५ दिवसांत वंदे भारत ट्रेन धावणार!

कोल्हापूर : पुणे-कोल्हापूर या दरम्यान धावणारी वंदे भारत आता मुंबईपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. क्षेत्रीय