पृथ्वी शॉला मोठा झटका, काऊंटी क्रिकेटमधून बाहेर

  96

लंडन: अनेकदा नशिबाची मर्जी नसेल तर कोणतेच काम पूर्ण होत नाही. असेच काहीसे टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पृथ्वी शॉबाबत (prithvi shaw) घडत आहे. पृथ्वी शॉ काऊंटी वनडे कपमध्ये (county one day cup) धमाकेदार कामगिरीनंतर दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर झाला आहे.



चार सामन्यानंतर झाला दुखापतग्रस्त


पृथ्वी शॉ गुडघ्याच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामासाठी बाहेर झाला आहे. हंगामात त्याने चार सामने खेळले. नॉर्थमन्टनशरकडून खेळताना पहिल्या दोन सामन्यात त्याला केवळ ३४ आणि २६ धावा करता आल्या. यानंतर त्याने शानदार पुनरागमन करताना दुहेरी शतक ठोकले. २४४ धावांची खेळी त्याने समरसेटविरुद्ध खेळली. यानंतर पुढील सामन्यात डरहमविरुद्ध नाबाद १२५ धावा ठोकल्या. मात्र त्यानंतर तो दुखापतग्रस्त होत बाहेर गेला.



चार सामन्यात १४३च्या सरासरीने केल्या धावा


चार सामन्यात पृथ्वीने एकदा नाबाद राहत १४३च्या सरासरीने ४२९ धावा केल्या. यात दुहेरी शतकासह एकूण दोन शतकांचा समावेश आहे. पृथ्वी हाच शानदार फॉर्म कायम राखत एकदिवसीय विश्वचषकासाठी आपली दावेदारी सिद्ध करू शकला असता. मात्र त्याच्या हातून ही संधीही गेली.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र