India China: भारत-चीन यांच्यात कमांडर स्तरावर बैठक, या मुद्द्यांवर चर्चा

नवी दिल्ली: भारत (india) आणि चीन (china) यांच्यातील सैन्यामध्ये झालेल्या १९व्या फेरीतील चर्चेनंतर कोणतेही ठोस यश मिळाले नाही. दोन्ही देशांच्या सैन्यांनी १३-१४ ऑगस्टला एलएसीजवळ भारतीय क्षेत्रात चुशुल-मोल्डोमध्ये कोर कमांडर स्तरावरील १९व्या फेरीतील चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयाच्या विधानानुसार दोन्ही पक्षांनी पश्चिम क्षेत्रात एलएसीवर इतर मुद्द्यांवर सकारात्मक, रचनात्मक आणि गहन चर्चा केली. ही चर्चा सकाळी साडे नऊ वाजता सुरू झाली आणि तब्बल १० तास सुरू होती.


परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार बैठकीदरम्यान चीन इतर मुद्द्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यास सहमत झाला. शेजारील देश आणि राजनायिक चॅनेल्सच्या माध्यमातून बातचीत कायम ठेवण्यावरही त्यांनी सहमती दर्शवली. दोन्ही देशांनी सीमावर्ती क्षेत्रांमध्ये शांतता कायम ठेवण्यास सहमती दाखवली.


याआधी सूत्रांच्या हवाल्याने असे सांगण्यात आले होते की दोन्ही देशांनी पूर्व लडाखमध्ये एलएसीवर सैनिकांच्या पुनरागमनाबाबतच्या संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली. भारताने बैठकीत देपसांग आणि डेमचोकसह इतर ठिकाणी सैन्याचे पुनरागमन करण्याबाबत दबाव टाकला. सोबतच या बैठकीत तणाव कमी करण्याबाबतही चर्चा झाली.



याआधी एप्रिलमध्ये झाली होती १८वी फेरी


याआधी एप्रिल महिन्यात पूर्व लडाख येथे भारत आणि चीन यांच्यात कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेची १८वी फेरी पार पडली होती. या बैठकीचे नेतृत्व भारताचे लेफ्टनंट जनरल रशीम बाली यांनी केले होते. दुसरीकडे तितक्याच दर्जाच्या चीनच्या अधिकाऱ्याने त्यांची बाजू मांडली होती.


२०२० मध्ये गलवान येथे भारतीय सैन्य तसेच चीनच्या सैन्यांमध्ये हिंसक संघर्ष झाला. या संघर्षानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.

Comments
Add Comment

Loud DJ music kills 140 chickens : उत्तर प्रदेशमध्ये डीजेच्या भयानक आवाजाने १४० कोंबड्यांचा मृत्यू; DJ चालकावर FIR दाखल

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सुलतानपूर (Sultanpur) जिल्ह्यातून एक अतिशय विचित्र आणि तितकीच धक्कादायक घटना

अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ दुर्मिळ वस्तू, वस्तूची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

America returns 657 rare items to India : भारतातून अनेक प्राचीन वस्तू, मूर्ती यांची त्यांच्या दुर्मिळतेमुळे परदेशांमध्ये तस्करी (smuggling)

1 may labour day : १ मे रोजी बँका सुरू राहणार की बंद ? नवीन माहिती पहा

मुंबई : उद्या, १ मे रोजी बँकांना सुट्टी असणार का? १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या कामगार चळवळीची आठवण

Crime Jharkhand : आधी प्रियकरावर पैसा उडवला नंतर प्रियकराच्या प्रेमात भयानक करून बसली, थेट आईलाच...

Jharkhand Crime : झारखंडची राजधानी रांचीमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका ५० वर्षाच्या महिलेची हत्या

Raja Raghuvanshi Case: 11 महिन्यांनतर सोनम जेलमधून बाहेर, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित

शिलॉन्ग  Shillong : राजा रघुवंशी हत्या प्रकरणाने संपूर्ण देशभरात खळबळ उडवून दिली होती. याच राजा रघुवंशी हत्या प्रकरणात

भीषण ! एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग , अल्पवयीन मुलीसह 5 जणांचा करून अंत

दिल्ली : दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण दुर्घटना झाली आहे. मुलाची नोकरी मिळवण्याची इच्छा पूर्ण