दिल्लीत इंडिया आघाडीत फूट?काँग्रेसची सर्व ७ जागांवर लढण्याची घोषणा, आपचे सूचक विधान

नवी दिल्ली: एनडीएला (NDA) कडवी टक्कर देण्यासाठी २६ विरोधी पक्ष एकाच मंचावर एकत्र आले आहेत. यांनी पक्षांनी आपल्या आघाडीला I.N.D.I.A हे नाव दिले आहे. सर्व विरोधी पक्ष (opposition party) एकत्र येत भाजपला सत्तेबाहेर करण्याचा दावा करत आहेत. मात्र जागा वाटपावरून येथील पक्षांमध्ये अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. असे मानले जात आहे की आगामी ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला मुंबईत होणाऱ्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाऊ शकतो.


यात दिल्लीमध्ये आघाडीत बिघाडी होत असल्याचे दिसत आहे. कारण, काँग्रेसने राजधानी दिल्लीतील सर्व लोकसभा जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. दिल्लीत काँग्रेस नेतृत्वात एक महत्त्वाची बैठक पार पडली. यात पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, केसी वेणुगोपालसह इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. बैठकीनंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी स्पष्ट केले की त्यांचा पक्ष दिल्लीतील सर्व जागांवर निवडणूक लढवणार आहे. त्यांचा स्वत:चा एक मार्ग आहे आणि या बैठकीत आम आदमी पक्ष अथवा इतर आघाडीबाबत कोणतीही चर्चा झाली.


दिल्लीत तीन मुख्य पक्ष आहेत ते म्हणजे आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भाजप. लोकसभा निवडणुकीसाठी एकाच मंचावर एकत्र आलेल्या पक्षांमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टी आहे. अशातच काँग्रेसने राजधानी दिल्लीतील सर्व जागांवर निवडणूक लढवण्याचा घेतलेला हा निर्णय आघाडीसाठी एखाद्या झटक्याहून कमी नाही.


काँग्रेस नेता अनिल चौधरीने दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या आघाडीबाबत लोकसभा निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर सांगितले, काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करत एकजून होऊन लढणार. आम्ही आम आदमी पक्ष अथवा आघाडीची कोणतीही चर्चा केली नाही. काँग्रेसच्या या तीन तास चाललेल्या बैठकीत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, केसी वेणुगोपाल आणि दीपक बाबरिया उपस्थित होते.





आम आदमीचा पलटवार


काँग्रेसच्या बैठकीनंतर आम आदमी पक्षानेही याबाबत विधान केले आहे. दिल्लीचे मंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख प्रवक्ता सौरभ भारद्वाज म्हणाले की, जेव्हा 'INDIA' आघाडीतील सर्व पक्ष एकत्र येतील, जागा वाटपावर चर्चा करतील, सर्व पक्षांचे राष्ट्रीय नेतृत्व समोर येत चर्चा करतील. तेव्हा समजेल की कोणत्या पक्षाला कोणत्या जागा मिळतील. ही खूप पुढची गोष्ट आहे.

Comments
Add Comment

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या

Narendra Modi : पंतप्रधान मोदी शुक्रवारी देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला दाखवणार हिरवा झेंडा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.