राजगडावर फिरायला आलेल्या पर्यटकाचा मृत्यू, स्वातंत्र्यदिनी घडली दुर्घटना

मुंबई: स्वातंत्र्यदिनानिमित्त सुट्टी आणि त्याआधी आलेली शनिवारी रविवारची सुट्टी अशा लाँग वीकेंडमुळे पर्यटकांनी विविध पर्यटनस्थळांना भेटी देणे पसंत केले. राज्यात अनेक पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र ही सुट्टी एका तरूणाच्या जीवावर बेतली.


राजगडावर फिरायला गेलेल्या एका पर्यटकाचा तेथीलच पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला आहे. मंगळवारी पहाटेच्या वेळेस ही दुर्घटना घडली.पुण्याच्या राजगड किल्ल्यावरील पद्मावती पाण्याच्या टाकीत पडून एका तरूणाचा मृत्यू झाला. अजय मोहन कल्लामपारा असे या मृत तरूणाचे नाव आहे. तो ३३ वर्षांचा होता.


अजय ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात राहत होता. तो टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट लिमिटेड कंपनीत काम करत होता. सलग सुट्टी आल्याने अजय आपल्या मित्रांसोबत किल्ल्यावर फिरायला आला होता. तो आणि त्याचे मित्र असे चौघेजण किल्ल्यावर आले होते.



कशी घडली दुर्घटना?


मिळालेल्या माहितीनुसार, अजय हा मित्रांसोबत सोमवारी किल्ल्यावर होता. सोमवारच्या रात्री तो किल्ल्यावरील पद्मावती टाकीत पाणी काढण्यासाठी गेला. मात्र पाणी काढत असतानाच त्याचा तोल गेला आणि तो पाण्याच्या टाकीत पडला. रात्रीच्या वेळेस काळोख असल्याने अजय कुठे गेला याचा शोध काही त्याच्या मित्रांना लागेना. त्यांनी शोधण्याचा खूप प्रयत्न केला मात्र त्यांना यश मिळाले नाही. सकाळी जेव्हा त्यांनी पुन्हा अजयला शोधले तेव्हा त्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत होता.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद