राजगडावर फिरायला आलेल्या पर्यटकाचा मृत्यू, स्वातंत्र्यदिनी घडली दुर्घटना

मुंबई: स्वातंत्र्यदिनानिमित्त सुट्टी आणि त्याआधी आलेली शनिवारी रविवारची सुट्टी अशा लाँग वीकेंडमुळे पर्यटकांनी विविध पर्यटनस्थळांना भेटी देणे पसंत केले. राज्यात अनेक पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र ही सुट्टी एका तरूणाच्या जीवावर बेतली.


राजगडावर फिरायला गेलेल्या एका पर्यटकाचा तेथीलच पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला आहे. मंगळवारी पहाटेच्या वेळेस ही दुर्घटना घडली.पुण्याच्या राजगड किल्ल्यावरील पद्मावती पाण्याच्या टाकीत पडून एका तरूणाचा मृत्यू झाला. अजय मोहन कल्लामपारा असे या मृत तरूणाचे नाव आहे. तो ३३ वर्षांचा होता.


अजय ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात राहत होता. तो टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट लिमिटेड कंपनीत काम करत होता. सलग सुट्टी आल्याने अजय आपल्या मित्रांसोबत किल्ल्यावर फिरायला आला होता. तो आणि त्याचे मित्र असे चौघेजण किल्ल्यावर आले होते.



कशी घडली दुर्घटना?


मिळालेल्या माहितीनुसार, अजय हा मित्रांसोबत सोमवारी किल्ल्यावर होता. सोमवारच्या रात्री तो किल्ल्यावरील पद्मावती टाकीत पाणी काढण्यासाठी गेला. मात्र पाणी काढत असतानाच त्याचा तोल गेला आणि तो पाण्याच्या टाकीत पडला. रात्रीच्या वेळेस काळोख असल्याने अजय कुठे गेला याचा शोध काही त्याच्या मित्रांना लागेना. त्यांनी शोधण्याचा खूप प्रयत्न केला मात्र त्यांना यश मिळाले नाही. सकाळी जेव्हा त्यांनी पुन्हा अजयला शोधले तेव्हा त्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत होता.

Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी