तांदूळ द्या, टोमॅटो घ्या, या देशाने भारताकडे केलीये ही मागणी

मुंबई: सध्या देशात सगळीकडेच टोमॅटोचे (tomato rate) दर प्रचंड भाव खात आहेत. टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. टोमॅटोच्या वाढत्या किंमतीच्या हाहाकारातच आता भारताच्या मदतीसाठी शेजारील देश नेपाळ (nepal) पुढे आला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की देशात टोमॅटोची पूर्तता करण्यासाठी नेपाळमधून मोठ्या प्रमाणात टोमॅटो आयात (tomato import) केला जात आहेत. नेपाळमधून आयात केले जाणारे टोमॅटो लवकरच येत आहेत. हे टोमॅटो देशात पोहोचताच अनेक राज्यांमध्ये टोमॅटो पाठवले जातील.


नेपाळमधून आयात टोमॅटो उत्तर भारतातील राज्यांमध्ये पाठवले जातील. खासकरून हे टोमॅटो उत्तर प्रदेशात पाठवले जातील. देशात टोमॅटोच्या किंमती जुलै महिन्यात वाढण्यास सुरूवात झाली आणि एक वेळ अशी आली की टोमॅटो तब्बल २५० रूपये किलो इतके वाढले. काही ठिकाणी तर टोमॅटोचे दर ३०० रूपये किंलोपर्यंत वाढले होते. सरकारने लोकांना यापासून दिलासा देण्यासाठी सबसिडीवर टोमॅटो विकण्यास सुरूवात केली. सबसिडी असलेल्या टोमॅटोचे दर सध्या कमी होऊन ५० रूपये इतके झाले आहेत यामुळे सामान्य लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.



भारताला पहिल्यांदा आयात करावे लागत आहेत टोमॅटो


आऊटलूकच्या एका रिपोर्टनुसार टोमॅटोच्या वाढत्या किंमतीदरम्यान भारत पहिल्यांदाच टोमॅटो आयात करत आहेत. शुक्रवारी नेपाळच्या कृषीमंत्रालयाच्या प्रवक्ता शबनम शिवकोटी यांनी वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना सांगितले की नेपाळ भारताला टोमॅटोसारखी भाजी पाठवण्यास इच्छुक आहे. मात्र त्यासाठी भारताला दुसऱ्या गरजेच्या सुविधा द्याव्या लागतील. नेपाळमध्ये काठमांडू, ललिपूर आणि भक्तपूर येथे मोठ्या प्रमाणात टोमॅटोची शेती केली जाते.



टोमॅटोच्या बदली तांदूळ


नेपाळचे वृत्त द काठमांडू पोस्टच्या बातमीनुसार टोमॅटो निर्यात करत असलेल्या नेपाळ सरकारने भारत सरकारला एक पत्र लिहून आग्रह केला आहे की ते नेपाळला भारत आणि साखर निर्यात करावी त्या बदल्यात ते भारताला दीर्घकाळ टोमॅटो निर्यात करतील. भारत सरकारने डोमेस्टिक स्तरावरील किंमती नियंत्रित राखण्यासाठी २० जुलैला गैर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. या बंदीचा परिणाम अमेरिका, ऑस्ट्रेलिया सह भारताचा शेजारील देश नेपाळवरही परिणाम झाला आहे.

Comments
Add Comment

चिराग पासवानांनी घेतली नितीश कुमारांची भेट! एनडीएमध्ये विकासाची नवी समीकरणे?

Bihar election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या दमदार विजयामुळे राज्याच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना

सनातन एकता पदयात्रेदरम्यान बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांची प्रकृती चिंताजनक

मथुरा : सनातन एकता पदयात्रेच्या आठव्या दिवशी बागेश्वर धामाचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ

Delhi Crime : धक्कादायक! चालत्या गाडीत विवाहित प्रेयसीची क्रूर हत्या; थेट शीर कापले, मृतदेह नाल्यात फेकला अन्...

दिल्ली : नोएडामध्ये घडलेल्या एका भीषण हत्याकांडाने संपूर्ण परिसर तसेच पोलीस प्रशासनाला हादरवून सोडले आहे.

PM Kisan Yojana : बिहारमध्ये 'विजयाच्या त्सुनामी'नंतर PM मोदींचं मोठं गिफ्ट! ११ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे

बिहार : बिहार निवडणुकीत एनडीएच्या भव्य विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष

राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर

Nowgam Police Station Blast : चार दिवसांत देशाला दुहेरी धक्का! श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्टेशन स्फोटाचे नेमकं कारण काय?

श्रीनगर : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी, १० नोव्हेंबर रोजी i-२० कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात १२ जणांचा