Independence Day : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर डीपीला तिरंग्याचा फोटो ठेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) पार्श्वभूमीवर लोकांना सोशल मीडियावरील डीपी बदलून राष्ट्रध्वजाचा डीपी ठेवण्याचे आवाहन केले आहे. देशाप्रतिचं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी जनतेला हे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदींनी रविवारी ट्वीट करुन देशासोबतचे नाते अधिक दृढ करण्यासाठी जनतेला हे पाऊल उचलण्यास सांगितले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर हँडलवरुन केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, "हर घर तिरंगा मोहिमेच्या भावनेनुसार, आपण आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सचा डीपी बदलूया आणि देशासोबतचं आपलं नातं अधिक दृढ करण्यासाठी योगदान देऊया." स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी देखील त्यांच्या फेसबुक आणि ट्विटर या सोशल मीडियावरील अकाऊंटचा डीपी बदलला असून आता त्यांच्या डीपीवर तिरंगा ध्वजाचा फोटो आहे.


यंदा स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात १,८०० विशेष पाहुणे सहभागी होणार आहेत. एका अधिकृत प्रकाशनात म्हटलं आहे की, "पंतप्रधान मोदींचे भाषण ऐकण्यासाठी आमंत्रित केलेल्या १,८०० विशेष पाहुण्यांमध्ये जल जीवन मिशन, पीएम किसान सन्मान निधी योजना, अमृत सरोवर योजना आणि सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प यासारख्या विविध प्रमुख कार्यक्रमांशी संबंधित लोकांचा समावेश आहे."

Comments
Add Comment

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा