पुण्यातील चांदणी चौक प्रकल्पाचे आज गडकरींच्या हस्ते होणार उद्घाटन

  160

पुणे: शहरातील वाहतूक कोंडी (traffic) कमी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या चांदणी चौक उड्डाणपूलाचे (chandani chowk flyover) अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर उद्घाटन केले जात आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या उड्डाणपूलाचे उद्घाटन केले जाणार आहे. यावेळी मंत्री नितीन गडकरी (Nitin gadkari) यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis), आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असतील. या उड्डाणपूलाच्या प्रकल्पाचा नारळ पाच वर्षांपूर्वी फोडण्यात आला होता.

भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण परियोजना राज्य सरकार आणि पुणे नगर विकास यांच्या योगदानातून हा उड्डाणपूल बनवण्यात आला आहे. चांदणी चौक हे मुख्य जंक्शन आहे जे बावधन, एनडीए, पाषाण, मुळशी रोड, मुंबई-बंगळुरू बायपासला जोडते. येथील वाहतूक कोंडी लक्षात घेता या उड्डाणपूलाची उभारणी करण्यात आली.

य़ा नव्या उड्डाणपूलामुळे येथून आता दिवसाला दीड लाख वाहने धावू शकतील असा अंदाज आहे. याआधी ही संख्या ३० ते ३५ हजार इतकी होती. फेब्रुवारी २०१९मध्ये या उड्डाणपुलाच्या कामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. या उड्डाणपूलामुळे येथीील नागरिकांना आता मुख्य रस्त्यावरून प्रवास करण्याची गरज नाही. या रस्त्यावर केवळ मुंबईला जाणाऱ्या तसेच येणाऱ्या वाहनांचा समावेश असेल.

वाहतूक कोंडीतून सुटका

पुणे शहरातील या भागात सातत्याने वाहतूक कोंडी होत असे. या वाहतूक कोंडीचा विचार करता हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. यामुळे पश्चिम भागामध्ये होणारी वाहतूक कोंडी सुटणार आहे.

Comments
Add Comment

Independence Day 2025: विकासाच्या वाटचालीत मोदी सरकारला साथ द्या: मंत्री मंगलप्रभात लोढा

गोंदिया:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने मागील ११ वर्षांत जलद गतीने प्रगती साधली असून भारत

खडसेंच्या जावयावर आणखीन एक गुन्हा दाखल, महिलेचे चोरून फोटो अन् व्हिडिओ काढले...

प्रांजल खेवलकरच्या अडचणीत वाढ पुणे: एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचा पती प्रांजल खेवलकरच्या अडचणीत

Manoj Jarange Patil : मुंबई दौऱ्याआधीच जरांगेंची तब्येत बिघडली! नेमकं काय घडलं?

डॉक्टरांनी दिला विश्रांती घेण्याचा सल्ला नांदेड: मराठा आरक्षणासाठी गेले अनेक वर्ष संघर्ष करत असलेले मनोज

स्वातंत्र्यदिनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दिग्गजांचा अजित पवारांनी केला सत्कार

बीड : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकारी व

आंबा घाटात दरड कोसळली ! वाहतूक ठप्प

रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर आंबा घाटात दरड कोसळण्याची गंभीर घटना घडली आहे. साखरपा मुर्शी चेक

मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करताय तर वाहतुकीचे हे बदल पाहा

गणपती म्हटलं की कोकणकर गावाला जाणार नाही असं होत नाही. मात्र दरवर्षीप्रमाणे त्रासदायक असणारा मार्ग म्हणजे