पुण्यातील चांदणी चौक प्रकल्पाचे आज गडकरींच्या हस्ते होणार उद्घाटन

पुणे: शहरातील वाहतूक कोंडी (traffic) कमी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या चांदणी चौक उड्डाणपूलाचे (chandani chowk flyover) अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर उद्घाटन केले जात आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या उड्डाणपूलाचे उद्घाटन केले जाणार आहे. यावेळी मंत्री नितीन गडकरी (Nitin gadkari) यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis), आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असतील. या उड्डाणपूलाच्या प्रकल्पाचा नारळ पाच वर्षांपूर्वी फोडण्यात आला होता.


भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण परियोजना राज्य सरकार आणि पुणे नगर विकास यांच्या योगदानातून हा उड्डाणपूल बनवण्यात आला आहे. चांदणी चौक हे मुख्य जंक्शन आहे जे बावधन, एनडीए, पाषाण, मुळशी रोड, मुंबई-बंगळुरू बायपासला जोडते. येथील वाहतूक कोंडी लक्षात घेता या उड्डाणपूलाची उभारणी करण्यात आली.


य़ा नव्या उड्डाणपूलामुळे येथून आता दिवसाला दीड लाख वाहने धावू शकतील असा अंदाज आहे. याआधी ही संख्या ३० ते ३५ हजार इतकी होती. फेब्रुवारी २०१९मध्ये या उड्डाणपुलाच्या कामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. या उड्डाणपूलामुळे येथीील नागरिकांना आता मुख्य रस्त्यावरून प्रवास करण्याची गरज नाही. या रस्त्यावर केवळ मुंबईला जाणाऱ्या तसेच येणाऱ्या वाहनांचा समावेश असेल.



वाहतूक कोंडीतून सुटका


पुणे शहरातील या भागात सातत्याने वाहतूक कोंडी होत असे. या वाहतूक कोंडीचा विचार करता हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. यामुळे पश्चिम भागामध्ये होणारी वाहतूक कोंडी सुटणार आहे.

Comments
Add Comment

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना

Bacchu Kadu Farmers Andolan : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बच्चू कडू आज मुंबईत; संध्याकाळी ७ वाजता थेट मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा!

७ वाजता महाबैठक! मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार मुंबई : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून

Weather Updates : समुद्र खवळणार, प्रशासनाची मोठी खबरदारी! हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा मोठा निर्णय

अरबी समुद्र (Arabian Sea) आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) झालेल्या हवामान बदलांमुळे (Weather Changes) महाराष्ट्राच्या

प्रतीक्षा संपली! नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नेरळ-माथेरान मिनी ट्रेन धावणार!

नेरळ : मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ-माथेरान दरम्यानची बहुप्रतिक्षित मिनी ट्रेन सेव