Car Accident : मुंबईत कार अपघातात गाडीचे २ तुकडे, २ मुलींसह ५ जण गंभीर जखमी

  89

मुंबई : मुंबईत कुर्ला परिसरात वेगात आलेल्या एर्टिगा कारची वीजेच्या खांबाला धडक बसून झालेल्या भीषण अपघातामध्ये (Car Accident) कारचे दोन तुकडे झाल्याची घटना घडली. सदर घटना मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडली.


कारमधून प्रवास करणाऱ्या २ मुलींसह ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांना कार खांबापासून वेगळी करण्यासाठी तब्बल १ तास लागला. कार पूर्णपणे खांबात अडकली होती. यानंतर आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. स्थानिक व पोलिसांच्या मदतीने जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची घटना मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. एर्टिगा कार वेगाने चेंम्बुरकडे जात होती. मात्र, एससीएलआर ब्रीजजवळ पोहोचताच चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि गाडीने एका वीजेच्या खांबाला जोरात धडक दिली. गाडीचा वेग अधिक असल्याने कारचे जागेवरच दोन तुकडे झाले. तुटलेल्या गाडीचा फोटो पाहून अपघाताची भीषणता आणि गाडीचा वेग लक्षात येते.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता