मुंबई : मुंबईत कुर्ला परिसरात वेगात आलेल्या एर्टिगा कारची वीजेच्या खांबाला धडक बसून झालेल्या भीषण अपघातामध्ये (Car Accident) कारचे दोन तुकडे झाल्याची घटना घडली. सदर घटना मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडली.
कारमधून प्रवास करणाऱ्या २ मुलींसह ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांना कार खांबापासून वेगळी करण्यासाठी तब्बल १ तास लागला. कार पूर्णपणे खांबात अडकली होती. यानंतर आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. स्थानिक व पोलिसांच्या मदतीने जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची घटना मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. एर्टिगा कार वेगाने चेंम्बुरकडे जात होती. मात्र, एससीएलआर ब्रीजजवळ पोहोचताच चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि गाडीने एका वीजेच्या खांबाला जोरात धडक दिली. गाडीचा वेग अधिक असल्याने कारचे जागेवरच दोन तुकडे झाले. तुटलेल्या गाडीचा फोटो पाहून अपघाताची भीषणता आणि गाडीचा वेग लक्षात येते.
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…