Car Accident : मुंबईत कार अपघातात गाडीचे २ तुकडे, २ मुलींसह ५ जण गंभीर जखमी

मुंबई : मुंबईत कुर्ला परिसरात वेगात आलेल्या एर्टिगा कारची वीजेच्या खांबाला धडक बसून झालेल्या भीषण अपघातामध्ये (Car Accident) कारचे दोन तुकडे झाल्याची घटना घडली. सदर घटना मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडली.


कारमधून प्रवास करणाऱ्या २ मुलींसह ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांना कार खांबापासून वेगळी करण्यासाठी तब्बल १ तास लागला. कार पूर्णपणे खांबात अडकली होती. यानंतर आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. स्थानिक व पोलिसांच्या मदतीने जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची घटना मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. एर्टिगा कार वेगाने चेंम्बुरकडे जात होती. मात्र, एससीएलआर ब्रीजजवळ पोहोचताच चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि गाडीने एका वीजेच्या खांबाला जोरात धडक दिली. गाडीचा वेग अधिक असल्याने कारचे जागेवरच दोन तुकडे झाले. तुटलेल्या गाडीचा फोटो पाहून अपघाताची भीषणता आणि गाडीचा वेग लक्षात येते.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

महानगरपालिकेच्या सर्वच कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’चे पूर्ण राष्ट्रीय गीत वाजणार, सभागृहात केला ठराव मंजूर

मुंबई: भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात प्रेरणादायी आणि शक्तीशाली नारा ठरलेल्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय

मुंबई महापालिकेची सर्व परिपत्रके मराठीतूनच काढा; भाजपचे स्वीकृत नगरसेवक प्रविण छेडा यांची सभागृहात मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेचे कामकाज हे शंभर टक्के मराठीतून असतानाही आजही कामगारां विषयांच्या तसेच इतर बाबींची

महापालिका सभागृहात गुंजणार ‘जय जय महाराष्ट्र माझा’; महापालिका सभागृहात एकमताने ठराव मंजूर

मुंबई: महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत असलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताची धून आता

महापालिका शाळांमध्ये वर्षातून दोनदा भरवा विज्ञान प्रदर्शन

मुंबई : विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क