Cricket updates: शाकिबकडे बांग्लादेशच्या वनडे संघाचे नेतृत्व

तमीम इक्बालने बांग्लादेश एकदिवसीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याच्या एका आठवड्यानंतर शुक्रवारी शाकिब अल हसनच्या खांद्यावर संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी याची अधिकृत घोषणा केली. आगामी आशिया कप आणि विश्वचषक स्पर्धेकरिता शाकिब बांगलादेशच्या संघाचे नेतृत्व करणार आहे.


आगामी आशिया कप आणि वर्ल्ड कपकरिता बांगलादेशच्या संघाची घोषणा उद्या शनिवारी करण्यात येणार आहे. एकूण १७ खेळाडूंची निवड केली जाणार आहे. त्याच्या एक दिवस आधी शुक्रवारी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने नव्या कर्णधाराची घोषणा केली.


शाकिब हा बांगलादेशचा अनुभवी खेळाडू आहे. त्याने ५२ एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचे कर्णधारपद सांभाळले आहे. शाकिब हसन यांनी वर्ष २००९ ते २०१७ दरम्यान नेतृत्व सांभाळले आहे. त्यांच्या नेतृत्वात संघाने २३ वेळा विजय मिळवला आहे. तर २६ वेळा संघाला अपयश आले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

अवघ्या १० षटकांत किवींचा उडवला धुव्वा, सूर्या-अभिषेकच्या वादळी खेळीने मालिका खिशात

गुवाहाटी  : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात क्रिकेट विश्वाला अचंबित करणारा विजय

T20I : गुवाहाटीत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत, भारताला मालिका जिंकण्याची संधी

गुवाहाटी  : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना रविवारी

आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी-२० विश्वचषकातून पत्ता कट, स्कॉटलंडचा प्रवेश

मुंबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठ्या भूमिकेवर कठोर कारवाई केली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा मुंबई (प्रतिनिधी) : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा संपल्यानंतर भारतीय महिला संघ

मुंबईत कुस्तीची महादंगल!

चार राज्यातले दिग्गज पैलवान भिडणार मुंबई : पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवान एकाच

न्यूझीलंडविरुद्धच्या रायपूर टी २० मध्ये भारताचा विजय, मालिकेत २-० अशी आघाडी

रायपूर : भारताने न्यूझीलंडविरुद्धची रायपूरमधील टी २० मॅच सात विकेट राखून जिंकली. या विजयासह भारताने पाच मॅचच्या