Cricket updates: शाकिबकडे बांग्लादेशच्या वनडे संघाचे नेतृत्व

तमीम इक्बालने बांग्लादेश एकदिवसीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याच्या एका आठवड्यानंतर शुक्रवारी शाकिब अल हसनच्या खांद्यावर संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी याची अधिकृत घोषणा केली. आगामी आशिया कप आणि विश्वचषक स्पर्धेकरिता शाकिब बांगलादेशच्या संघाचे नेतृत्व करणार आहे.


आगामी आशिया कप आणि वर्ल्ड कपकरिता बांगलादेशच्या संघाची घोषणा उद्या शनिवारी करण्यात येणार आहे. एकूण १७ खेळाडूंची निवड केली जाणार आहे. त्याच्या एक दिवस आधी शुक्रवारी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने नव्या कर्णधाराची घोषणा केली.


शाकिब हा बांगलादेशचा अनुभवी खेळाडू आहे. त्याने ५२ एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचे कर्णधारपद सांभाळले आहे. शाकिब हसन यांनी वर्ष २००९ ते २०१७ दरम्यान नेतृत्व सांभाळले आहे. त्यांच्या नेतृत्वात संघाने २३ वेळा विजय मिळवला आहे. तर २६ वेळा संघाला अपयश आले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात

भारत वि ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 सामना मेलबर्नमध्ये रंगणार

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे खेळवला

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल