Cricket updates: शाकिबकडे बांग्लादेशच्या वनडे संघाचे नेतृत्व

  166

तमीम इक्बालने बांग्लादेश एकदिवसीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याच्या एका आठवड्यानंतर शुक्रवारी शाकिब अल हसनच्या खांद्यावर संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी याची अधिकृत घोषणा केली. आगामी आशिया कप आणि विश्वचषक स्पर्धेकरिता शाकिब बांगलादेशच्या संघाचे नेतृत्व करणार आहे.


आगामी आशिया कप आणि वर्ल्ड कपकरिता बांगलादेशच्या संघाची घोषणा उद्या शनिवारी करण्यात येणार आहे. एकूण १७ खेळाडूंची निवड केली जाणार आहे. त्याच्या एक दिवस आधी शुक्रवारी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने नव्या कर्णधाराची घोषणा केली.


शाकिब हा बांगलादेशचा अनुभवी खेळाडू आहे. त्याने ५२ एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचे कर्णधारपद सांभाळले आहे. शाकिब हसन यांनी वर्ष २००९ ते २०१७ दरम्यान नेतृत्व सांभाळले आहे. त्यांच्या नेतृत्वात संघाने २३ वेळा विजय मिळवला आहे. तर २६ वेळा संघाला अपयश आले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी