पेण : मागील तेरा वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Highway) रखडलेले काम होत नसून या महामार्गावर महाकाय असे खड्डे देखील पडले आहेत. मात्र शासनाने या महामार्गाकडे आणि खड्ड्यांकडे लक्ष दिलेले नाही. याउलट खड्डे भरण्यासाठी पैसेच नसल्याचे राज्य सरकारने (State Government) सांगितल्याने आता आपणच रस्त्यावर उतरून भीक दो आंदोलन करणार आहोत, असे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे, सोबती संस्थेचे मंगेश नेने यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. रविवार १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता वाशी नाका, पेण येथे हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारने खड्डे भरायला पैसे नसल्याचे सांगितल्याने सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, पेण पत्रकार आणि सोबती संस्थेने या आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. यावेळी ते रस्त्यावर उतरून खड्डे भरण्यासाठी ‘भीक दो’ असं आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांनी आणि वाहन चालकांनी सहभागी व्हावे तसेच जास्तीत जास्त प्रवाशांनी हे खड्डे भरण्यासाठी चिल्लर स्वरूपात भीक द्यावी असे आवाहन समीर म्हात्रे यांनी केले आहे.
भीकेच्या स्वरूपात सदर जमा झालेली रक्कम एकत्र करून ती प्रशासनाच्या ताब्यात देऊन ती शासनाकडे पाठविण्याची विनंती करणार असल्याचे देखील यावेळी समीर म्हात्रे, मंगेश नेने यांनी सांगितले. यावेळी सदर आंदोलना बाबत तहसील कार्यालयात निवेदन देखील देण्यात आले आहे.
आमदार नितेश राणे यांचा रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला कोणाची बुद्धी लहान याबाबत राहुल गांधी आणि…
भोलेबाबा करायचा दुधाची अंघोळ; खीर बनवून वाटला जायचा प्रसाद लखनऊ : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या…
गुंडांच्या साथीने पुण्यात डॉक्टरचे भयानक कृत्य पुणे : पुण्यात सातत्याने चित्रविचित्र गुन्हेगारीच्या घटना (Pune Crime)…
बालहक्क मंडळाकडे वकिलांमार्फत केला सादर पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत…
तिन्ही गाड्यांचा चक्काचूर; एकाचा जागीच मृत्यू पुणे : सध्या अनेक मार्गांवर मोकळा रस्ता दिसताच वाहनचालक…
आता 'हे' असणार ब्रिटनचे नवे पंतप्रधान लंडन : ब्रिटनमध्ये (Britain) काल म्हणजेच ४ जुलै रोजी…