Asia cup: भारताच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव...

आशिया कपमध्ये भारताच्या जर्सीवर येणार पाकिस्तानचे नाव...


आगामी आशिया चषक स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय संघाच्या जर्सीवर पहिल्यांदाच पाकिस्तानचे नाव छापले जाणार आहे. आशिया कपच्या लोगोखाली यजमान संघाचे नाव असते. त्यामुळे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांच्या जर्सीवर ‘आशिया कप २०२३ पाकिस्तान’ छापण्यात येणार आहे.


आशिया चषक २०२३चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांना २०२३ च्या हंगामासाठी त्यांच्या जर्सीवर आशिया कपचा लोगो लावावा लागेल. त्याचबरोबर लोगोच्या खाली यजमान संघाचे नाव असणार आहे. त्यामुळे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांच्या जर्सीवर ‘आशिया कप २०२३ पाकिस्तान’ छापण्यात येणार आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या जर्सीवरही पाकिस्तानचे नाव लिहिले जाईल.


आशिया चषक स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होणार असून त्यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ यांचा समावेश आहे. सर्व संघांची ३-३ अशा दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. भारत, पाकिस्तान आणि नेपाळला गट-अ मध्ये ठेवण्यात आले आहे. तर, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि गतविजेता श्रीलंका यांना ब गटात ठेवण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन टप्प्यात खेळवली जाईल, ज्यामध्ये ग्रुप स्टेज आणि सुपर-४ स्टेजचा समावेश असेल.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या